शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग स्थलांतरित होण्याच्या भीतीने हिंजवडी राजकीय नकाशावर

By राजू इनामदार | Updated: July 27, 2025 14:11 IST

- भल्या पहाटे अजित पवारांची भेट : कामे होत नसल्याची सुप्रिया सुळे यांची तक्रार

पुणे : प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून कायमच दुर्लक्षित राहिलेले हिंजवडी आयटी पार्क तिथून अनेक कंपन्या स्थलांतरित होऊ लागल्याने आता राजकीय नकाशावर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे भल्या पहाटेपासून भेटी देत आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे तिथे काहीच कामे होत नसल्याची तक्रार करत आहेत. या दोघांमध्ये हिंजवडी आयटी पार्कवरून राजकीय शीतयुद्ध सुरू झाले असून, त्यामुळे प्रशासनालाही धावपळ करावी लागते आहे.

अल्पावधीतच झाले नाव

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कची स्थापना १९९९ मध्ये झाली. तंत्रज्ञानाधारित उद्योग सुरू झाल्यानंतर या आयटी पार्कचा झपाट्याने विकास झाला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तिथे प्रोजेक्ट सुरू केले. आजमितीस तिथे किमान ५ लाख कामगार काम करत असावेत. आशिया खंडातील एकमेव आयटीनगरी अशी ओळख यातून तयार झाली. काही कोटी रुपयांचा महसूल इथून सरकारला मिळतो. हिंजवडी, माण, मारुंजी अशा मोठ्या परिसरात हे उद्योग, म्हणजे आयटी कंपन्यांच्या इमारती उभ्या आहेत. तिथे दररोज काही लाख कामगारांची, त्यांच्या अधिकाऱ्यांची ये-जा होत असते.

अजूनही ग्रामपंचायत

अशी ख्याती असूनही या भागात अजूनही ग्रामपंचायत आहे. ५ लाख कामगार उद्योगनगरीत नाही, तर आसपासच्या परिसरामध्ये राहतात. त्यांना दररोज कंपन्यांमध्ये ये-जा करावी लागते. एमआयडीसी जिथे कंपन्या आहेत, त्याच भागापुरते पाहते. म्हणजे तिथे रस्ते आहेत; मात्र आयटी कंपनीच्या बाहेरच्या रस्त्यांकडे कोणाचे लक्ष नाही. वीज, पाणी, सांडपाणी, मलनिस्सारण व्यवस्था अशा साध्या मूलभूत सुविधांचीही इथे वानवा आहे. नाव मोठे आणि सुधारणांच्या नावे मात्र ठणठणाट अशी इथली स्थिती आहे. याच परिसरात राहणारे कामगार, नागरिक, सोसायट्यांमधील रहिवासी या अनागोंदीला वैतागले आहेत.

उद्योगांच्या स्थलांतरानंतर जाग

दररोजच्या वाहतूककोंडीला कंटाळूनच एक-दोन नव्हे, तर तब्बल ३७ कंपन्यांनी इथून स्थलांतर केले. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या सततच्या भेटी व प्रशासनावर आगपाखड त्यातूनच होते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभा अधिवेशनाआधी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली. इथे काहीच विकासकामे होत नसल्याची तोफ त्यांनी डागली. हा संपूर्ण परिसर त्यांच्या, म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. उपमुख्यमंत्री अजित पवार काय किंवा खासदार सुळे काय, कोणीही या भागाकडे कधीही विकासकामे, मूलभूत सुविधा या अर्थाने लक्ष दिले नव्हते.

सातत्याने बैठका

उद्योगांचे स्थलांतर होऊ लागल्यानंतर मात्र आता सर्वांनाच जाग आली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये पवार यांनी सातत्याने या परिसराला भेट देत अधिकाऱ्यांच्या जागेवर बैठका घेण्यास, त्यांना आदेश देण्यास व त्यानिमित्ताने त्यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली आहे. खासदार सुळेही हिंजवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे म्हणून ठिकठिकाणी टीका करताना दिसतात. त्याही या भागात आता सातत्याने भेट देत आहेत. त्यांच्या या सततच्या भेटींमुळे आता कुठे प्रशासनाला जाग आली असून, ते परिसरात फिरताना, कामांचे आराखडे करताना दिसतात.

- दोन्ही नेत्यांमध्ये यामुळे राजकीय शीतयुद्ध निर्माण झालेले दिसत आहे.

फायदा व्हावा

‘त्यांना याचे काय राजकीय श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या, आम्हाला चांगले रस्ते, वीज, पाणी मिळावे’ इतकीच येथील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची, स्थानिक रहिवाशांची अपेक्षा आहे. आयटी कंपन्यांचे स्थलांतर ही बाब गंभीर आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरही याकडे गंभीरपणे पाहिले जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या आदेशानंतरच उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने या भागाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याचेही सांगितले जाते.

हिंजवडी मेट्रोचे भवितव्य

उद्योगांचे असेच स्थलांतर होत राहिले तर त्याचा परिणाम वेगाने काम होत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी या पुण्यातील तिसऱ्या क्रमाकांच्या मेट्रो मार्गावरही होण्याची शक्यता आहे. किमान ५ ते १० लाख प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा धरून एका प्रख्यात कंपनीने या मेट्रोचे काम पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड) या तत्त्वावर घेतले आहे. काही हजार कोटींचा हा मेगा प्रकल्प उद्योग स्थलांतराचा वेग वाढला तर अडचणीत येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी