मावळ ( पिंपरी चिंचवड): मावळ तालुक्यात आज एक मोठी दुर्घटना घडली असून, कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी तळेगाव पोलीस,पिंपरी चिंचवड अग्निशामक दल, पी एम आर डी ए अग्निशामक दल, लष्कराचे एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
तसेच अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात घालवण्यात आले आहे. मात्र कुंड मळा येथे नैसर्गिक रांजणखळगे आहे. नदीच्या प्रवाहामध्ये रांजणखळले असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानंतर त्या ठिकाणी जखमी किंवा मृतांचा शोध घेणे अवघड असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.पूलाचा भाग बाहेर काढण्यासाठी प्रयत्नमावळ परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी मावळचे आमदार सुनील शेळके पोचले आहे. घटनास्थळी क्रेन पाचारण केले आहे. पाण्यात कोसळलेला पुलाचा लोखंडी भाग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.'सांगाड्याखाली लोक अडकण्याची शक्यताज्यावेळेस पुल कोसळला त्यावेळी पुन्हा वर शंभर ते दीडशे पर्यटक उभे होते. तसेच पुलाखालील भागामध्ये ही काहीजण नदीकाठी बसले होते. अचानक फुल कोसळल्याने त्याखाली अनेक जण दबले गेले आहेत. त्यांचा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तविली आहे. पुल अत्यंत जुना झालेला; प्रशासनाचे दुर्लक्षइंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे. तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.