शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

फिजिकली अनफिट बट मेंटली फिट होऊन पाण्यात उतरलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:13 IST

पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरू असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सुयश जाधवने सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे ...

पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरू असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सुयश जाधवने सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे केले आहे. नुकतीच जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स २०१८ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले असून, दोन कांस्यपदकेही मिळविली आहेत. अपंगत्वाने सीमाबंद झालेल्या आयुष्याला त्याने एक नवा आयाम दिला आहे.

सुयश मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूरचा. सहावीला असताना भावाच्या लग्नात खेळताना सुयशच्या हातात असलेल्या खेळण्याचा विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला आणि काही क्षणात त्याने दोनही अपघातात गमावले. काही काळ त्या अपघातामुळे त्याच्या आयुष्यात अंधार पसरलाही होता. पण त्यातून घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि आंतरिक ऊर्मीच्या जोरावर त्याने मात केली आणि नवा अध्याय रचला. त्याला खरं तर लहानपणापासून जलतरणाची आवड. त्याचे वडील नारायण यांनी त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकवले होते. इतर मुलांच्या तुलनेत याचा पोहण्याचा वेग बघून क्रीडा शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला क्रीडा क्षेत्रासाठी निवडले. अनेक जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये तो बक्षिसं मिळवत होता. अचानक अपघात झाला आणि जणू त्याच्या वाहत्या करिअरला खीळ बसली. पण त्याही परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला काहीही विशेष जाणवू दिले नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला वाढवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा सराव सुरू ठेवला. इयत्ता ९ वीत असताना त्याने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही.

आज त्याने विविध गटात सुमारे १०५ पदकांवर नाव कोरले आहे. एकदा तर अंगात १०४ डिग्री ताप असतानातो टँकमध्ये उतरला आणि जिंकलासुद्धा!

 

जगाचा चॅम्पियन होण्याची मनीषासर्व प्रवासाबद्दल सुयश म्हणतो, ‘खेळात असो किंवा आयुष्यात सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. प्रत्यक्ष खेळात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमता सिद्ध करणेही महत्त्वाचे असते. आशियात नव्हे तर संपूर्ण जगात चॅम्पियन बनण्याची त्याची मनीषा आहे.जकार्ता येथे गेल्यावर बदललेले तापमान आणि प्रवास यामुळे त्याला काहीसा थकवा जाणवत होता. मात्र, मुख्य स्पर्धेच्या आदल्या रात्री त्याच्या पायाला अचानक गोळे आले. त्याचा त्रास इतका वाढला की त्याने भारतात प्रशिक्षकांना फोन केला. अखेर त्यांनी काही उपाय सांगितले पण शरीरापेक्षा मन सक्षम ठेवणाऱ्या सुयशने शारीरिक त्रासावर जय मिळवून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले.