शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

फिजिकली अनफिट बट मेंटली फिट होऊन पाण्यात उतरलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:13 IST

पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरू असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सुयश जाधवने सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे ...

पुणे : आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे सुरू असताना नकळत्या वयात झालेल्या अपघातातून बाहेर पडून सुयश जाधवने सातासमुद्रापार भारताचे नाव मोठे केले आहे. नुकतीच जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्स २०१८ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले असून, दोन कांस्यपदकेही मिळविली आहेत. अपंगत्वाने सीमाबंद झालेल्या आयुष्याला त्याने एक नवा आयाम दिला आहे.

सुयश मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूरचा. सहावीला असताना भावाच्या लग्नात खेळताना सुयशच्या हातात असलेल्या खेळण्याचा विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला आणि काही क्षणात त्याने दोनही अपघातात गमावले. काही काळ त्या अपघातामुळे त्याच्या आयुष्यात अंधार पसरलाही होता. पण त्यातून घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि आंतरिक ऊर्मीच्या जोरावर त्याने मात केली आणि नवा अध्याय रचला. त्याला खरं तर लहानपणापासून जलतरणाची आवड. त्याचे वडील नारायण यांनी त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकवले होते. इतर मुलांच्या तुलनेत याचा पोहण्याचा वेग बघून क्रीडा शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला क्रीडा क्षेत्रासाठी निवडले. अनेक जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये तो बक्षिसं मिळवत होता. अचानक अपघात झाला आणि जणू त्याच्या वाहत्या करिअरला खीळ बसली. पण त्याही परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला काहीही विशेष जाणवू दिले नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला वाढवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा सराव सुरू ठेवला. इयत्ता ९ वीत असताना त्याने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही.

आज त्याने विविध गटात सुमारे १०५ पदकांवर नाव कोरले आहे. एकदा तर अंगात १०४ डिग्री ताप असतानातो टँकमध्ये उतरला आणि जिंकलासुद्धा!

 

जगाचा चॅम्पियन होण्याची मनीषासर्व प्रवासाबद्दल सुयश म्हणतो, ‘खेळात असो किंवा आयुष्यात सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. प्रत्यक्ष खेळात फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमता सिद्ध करणेही महत्त्वाचे असते. आशियात नव्हे तर संपूर्ण जगात चॅम्पियन बनण्याची त्याची मनीषा आहे.जकार्ता येथे गेल्यावर बदललेले तापमान आणि प्रवास यामुळे त्याला काहीसा थकवा जाणवत होता. मात्र, मुख्य स्पर्धेच्या आदल्या रात्री त्याच्या पायाला अचानक गोळे आले. त्याचा त्रास इतका वाढला की त्याने भारतात प्रशिक्षकांना फोन केला. अखेर त्यांनी काही उपाय सांगितले पण शरीरापेक्षा मन सक्षम ठेवणाऱ्या सुयशने शारीरिक त्रासावर जय मिळवून सुवर्णपदक भारताच्या नावावर केले.