शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला, अन्यथा परिषद झाल्यास आम्ही उधळून लावू'; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:23 IST

एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

- नेहा सराफ 

पुण्यात नुकतीच पार पडलेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर गुन्हा  दाखल झालेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भाजपने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने या मुद्द्यावर आपली आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

हिंदू धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेटही घेतली होती. पण यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी कालच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटलेले असताना आता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पुन्हा त्यासाठीचे निवेदन विश्रामबाग , फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.  यानंतर भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणण्यात आले आहे की, ' संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याची शांतता भंग करणे , पुण्यामध्ये धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या एल्गार  परिषदेचा खरा चेहरा शरजिल उस्मानीच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. एल्गार परिषदेवर बंदी घालावी आणि भविष्यात पुणे शहरा मध्ये एल्गार परिषदेला कार्यक्रमाला परवानगी देऊ नये'.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाMaharashtraमहाराष्ट्र