शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

बँकांकडून आकारला जाणारा दंड गोपनीय!; आरबीआयच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 14:57 IST

बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे.

ठळक मुद्देसजग नागरीक मंचाचे विवेक वेलणकर यांनी एसबीआयला माहिती अधिकारात मागितली माहितीएसबीआयने ही माहिती व्यावसायिक गुपीत असल्याचे दिले अजब उत्तर

पुणे : बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक अ‍ॅफ इंडियाने (आरबीआय) देखील त्यावर कोणताही निर्णय न घेता यासंदर्भातील तक्रार पुन्हा एसबीआयकडे पाठवत, त्यावर कडी केली. बँकेच्या आणि बँकांवरील नियंत्रकाची भूमिका पार पाडणाऱ्या आरबीआयच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एप्रिल २०१७ पासून बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे सक्तीचे केले आहे. अशी शिल्लक न ठेवणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल, असेही घोषित करण्यात आले आहे. खरे तर दंड आकारण्याबाबत आरबीआयने नोव्हेंबर २०१४मध्ये नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ग्राहकाच्या खात्यातील रक्कम किमान शिलकीच्या पेक्षा कमी झाल्यास संबंधित बँकेने खातेदाराला त्याबाबत कळविले पाहिजे. तसेच, किमान रक्कम ठेवण्यासाठी त्याला एक महिन्याची मुदत दिली पाहिजे. त्यानंतरही संबंधित खातेदार आपल्या खात्यातील रक्कम किमान शिल्लक पातळीपर्यंत आणण्यात अयशस्वी झाल्यास, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. मात्र ग्राहकाला कोणतीही नोटीस न देता तसेच, एक महिन्याच्या मुदतीचा नियम न पाळताच बँका दंड आकारत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्यानंतर सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी एसबीआयला माहिती अधिकारात माहिती मागितली. ज्यात दंड आकारण्यापूर्वी किती ग्राहकांना नियमावलीप्रमाणे नोटीस पाठविली, किती दंड केला आणि किती गोळा झाला, अशी माहिती मागितली. त्याला उत्तर देताना एसबीआयने ही माहिती व्यावसायिक गुपीत असल्याचे अजब उत्तर दिले. त्यावर वेलणकरांनी आरबीआयच्या कन्झुमर एज्युकेशन अ‍ॅण्ड कन्झुमर प्रोटेक्शन सेलकडे तक्रार दाखल केली. मात्र आरबीआयने त्यावर कोणतीही कार्यवारी करण्याऐवजी संबंधित तक्रारच एसबीआयकडे पाठवून दिली. तसेस त्यावर एसबीआयला परस्पर उत्तर देण्यास सांगितले. एसबीआयने देखील पुन्हा पूर्वीचेच उत्तर पाठविले. आरबीआयने तक्रारीचे निराकरण करणे गरजेचे आहे. मात्र, एखाद्या आस्थापनेविरोधातील तक्रारीवर त्यांनाच उत्तर द्यायला लावले आहे. वास्तविक यातील वस्तुस्थिती तपासून, त्यांनी संबंधित माहिती ग्राहकहितार्थ एसबीआयला देण्यास भाग पाडले पाहिजे होते. मात्र, या तक्रारींमध्ये केवळ पोस्टमनची भूमिका आरबीआयने पार पाडली असल्याचे वेलणकर म्हणाले. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPuneपुणेSBIएसबीआय