शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: February 23, 2017 02:29 IST

पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र

बारामती : पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत ६९.८७ टक्के मतदान झाले आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये हेच मतदान ६५.६० टक्के होते. जवळपास ४.२७% मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेला टक्क्याने अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे. वाढलेला टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरविणार, हे समजण्यासाठी अवघ्या काही तासांचीच प्रतीक्षा उरली आहे.पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण २७ लाख ९२ हजार २४५ मतदार होते. यामध्ये १४ लाख ७ हजार ५० पुरुष मतदार, तर १३ लाख २२ हजार १८३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात एकूण १९ लाख ५० हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्ये एकूण २५ लाख २२ हजार ९४८ मतदार होते. त्यापैकी त्यावेळी १६ लाख ५४ हजार ९७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा जिल्ह्यात शिरुर तालुक्यात सर्वाधिक ७५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर वेल्हा तालुक्यात ७५.३० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर इंदापूर तालुक्यात ७४.८० टक्के ,तर चौथ्या क्रमांकावर मावळमध्ये ७४.१६ टक्के मतदान झाले आहे. हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत कमी ६२.६८ टक्के मतदान झाले आहे. तर मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्येदेखील हवेलीमध्ये सर्वांत कमी ५५.८५ टक्के मतदान झाले होते. तर यंदा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वेल्हा तालुक्याची त्या वेळी प्रथम क्रमांकाची सर्वाधिक ७३.८७ टक्केवारी होती. तसेच इंदापूर तालुक्यात त्या वेळी द्वितीय क्रमांकाचे ७२.८९ टक्के मतदान झाले होते. तसेच यंदा मतदानात अग्रेसर असणारा शिरुर तालुका त्या वेळी ६६.६६ टक्के मतदानामुळे तुलनेने पिछाडीवर होता. सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ जागा आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ४२, शिवसेनेचे १३,काँग्रेसचे ११, बीजेपी ३, राहुल कुल गटाचे ३, तर इतर ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यंदा बारामती तालुक्यामध्ये एक गट संख्या घटली आहे. तर हवेलीमध्ये एक जागा वाढली आहे. त्यामुळे सदस्य संख्या ‘जैसे थे ’आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेवरील सत्ता राखणार का, राज्यातील सत्ताधारी बीजेपी, शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण भागात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पारावरील गप्पांमध्ये सध्या केवळ या निवडणुकीचेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.