शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: February 23, 2017 02:29 IST

पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र

बारामती : पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत ६९.८७ टक्के मतदान झाले आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये हेच मतदान ६५.६० टक्के होते. जवळपास ४.२७% मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेला टक्क्याने अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे. वाढलेला टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरविणार, हे समजण्यासाठी अवघ्या काही तासांचीच प्रतीक्षा उरली आहे.पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण २७ लाख ९२ हजार २४५ मतदार होते. यामध्ये १४ लाख ७ हजार ५० पुरुष मतदार, तर १३ लाख २२ हजार १८३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात एकूण १९ लाख ५० हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्ये एकूण २५ लाख २२ हजार ९४८ मतदार होते. त्यापैकी त्यावेळी १६ लाख ५४ हजार ९७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा जिल्ह्यात शिरुर तालुक्यात सर्वाधिक ७५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर वेल्हा तालुक्यात ७५.३० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर इंदापूर तालुक्यात ७४.८० टक्के ,तर चौथ्या क्रमांकावर मावळमध्ये ७४.१६ टक्के मतदान झाले आहे. हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत कमी ६२.६८ टक्के मतदान झाले आहे. तर मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्येदेखील हवेलीमध्ये सर्वांत कमी ५५.८५ टक्के मतदान झाले होते. तर यंदा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वेल्हा तालुक्याची त्या वेळी प्रथम क्रमांकाची सर्वाधिक ७३.८७ टक्केवारी होती. तसेच इंदापूर तालुक्यात त्या वेळी द्वितीय क्रमांकाचे ७२.८९ टक्के मतदान झाले होते. तसेच यंदा मतदानात अग्रेसर असणारा शिरुर तालुका त्या वेळी ६६.६६ टक्के मतदानामुळे तुलनेने पिछाडीवर होता. सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ जागा आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ४२, शिवसेनेचे १३,काँग्रेसचे ११, बीजेपी ३, राहुल कुल गटाचे ३, तर इतर ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यंदा बारामती तालुक्यामध्ये एक गट संख्या घटली आहे. तर हवेलीमध्ये एक जागा वाढली आहे. त्यामुळे सदस्य संख्या ‘जैसे थे ’आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेवरील सत्ता राखणार का, राज्यातील सत्ताधारी बीजेपी, शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण भागात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पारावरील गप्पांमध्ये सध्या केवळ या निवडणुकीचेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.