शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर?

By admin | Updated: February 23, 2017 02:29 IST

पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र

बारामती : पुणे जिल्ह्यात यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत ६९.८७ टक्के मतदान झाले आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये हेच मतदान ६५.६० टक्के होते. जवळपास ४.२७% मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेला टक्क्याने अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे. वाढलेला टक्का कोणाचे राजकीय भवितव्य ठरविणार, हे समजण्यासाठी अवघ्या काही तासांचीच प्रतीक्षा उरली आहे.पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण २७ लाख ९२ हजार २४५ मतदार होते. यामध्ये १४ लाख ७ हजार ५० पुरुष मतदार, तर १३ लाख २२ हजार १८३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात एकूण १९ लाख ५० हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्ये एकूण २५ लाख २२ हजार ९४८ मतदार होते. त्यापैकी त्यावेळी १६ लाख ५४ हजार ९७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा जिल्ह्यात शिरुर तालुक्यात सर्वाधिक ७५.६४ टक्के मतदान झाले आहे. तर त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर वेल्हा तालुक्यात ७५.३० टक्के, तिसऱ्या क्रमांकावर इंदापूर तालुक्यात ७४.८० टक्के ,तर चौथ्या क्रमांकावर मावळमध्ये ७४.१६ टक्के मतदान झाले आहे. हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत कमी ६२.६८ टक्के मतदान झाले आहे. तर मागील पंचवार्षिक २०१२ च्या निवडणुकीमध्येदेखील हवेलीमध्ये सर्वांत कमी ५५.८५ टक्के मतदान झाले होते. तर यंदा दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वेल्हा तालुक्याची त्या वेळी प्रथम क्रमांकाची सर्वाधिक ७३.८७ टक्केवारी होती. तसेच इंदापूर तालुक्यात त्या वेळी द्वितीय क्रमांकाचे ७२.८९ टक्के मतदान झाले होते. तसेच यंदा मतदानात अग्रेसर असणारा शिरुर तालुका त्या वेळी ६६.६६ टक्के मतदानामुळे तुलनेने पिछाडीवर होता. सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ जागा आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे ४२, शिवसेनेचे १३,काँग्रेसचे ११, बीजेपी ३, राहुल कुल गटाचे ३, तर इतर ३ अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. यंदा बारामती तालुक्यामध्ये एक गट संख्या घटली आहे. तर हवेलीमध्ये एक जागा वाढली आहे. त्यामुळे सदस्य संख्या ‘जैसे थे ’आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेवरील सत्ता राखणार का, राज्यातील सत्ताधारी बीजेपी, शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण भागात यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पारावरील गप्पांमध्ये सध्या केवळ या निवडणुकीचेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.