शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

वाटाणा हातातून गेला; टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:05 IST

दुष्काळ अन् पुरंदर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे.

वाघापूर : दुष्काळ अन् पुरंदर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे. याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही, तसेच हातात आलेले हक्काचे वाटाणा हे पीक बाजारभावाअभावी कवडीमोल दराने विकावे लागत आहे. तर, विहिरीमध्ये पाणीच नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठाही आता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.कारण, या वर्षी एक-दोन नक्षत्रे वगळता बहुतेक सर्वच नक्षत्रांनी पावसाकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच व्यावसायिक, दुकानदार यांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवडमध्येही शुकशुकाट पसरला आहे.शेतकºयांनी मोठ्या कष्टाने शेती पिकविली. ज्यांना पाणी आहे, त्यांनी ठिबकच्या साह्याने पिकांना पाणी दिले; परंतु त्या पिकांना सध्या बाजारभावही चांगला मिळत नाही. परिणामी, केलेला खर्चही निघतो की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. वाटाणा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनपुरी, वाघापूर, गुरोळी, राजेवाडी, पारगाव, माळशिरस, पोंढे, नायगाव, पिसर्वे, सिंगापूर, राजुरी, रिसे-पिसे, आणि परिसरातील गावांमधील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.कमी पावसावर येणारे वाटणापीक आजही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने ते जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी मजूर घेऊन भुईमूग, बाजरी, वाटाणा खुरपणी, तोडणी अशी कामे सुरू असून, अनेक ठिकाणी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांनी सायकल कोळपे हाती घेतले आहे. काही ठिकाणी कांदापिकासाठी आणि इतर पिकांसाठी वाफे तयार करणे, सरी ओढणे अशी कामे सुरू आहेत. मात्र, सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. सोनोरी, राजुरी या गावांमध्ये नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.पुरंदर उपसा योजना लवकरचकार्यान्वित होण्याची शेतकरी मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. कारण, या माध्यामातून पिकांना जीवदान मिळाल्यास किमान दोन पैसे मिळवून खर्च तरी निघेल, अशी अपेक्षा आहे.पूर्व भागातील राजुरी आणि परिसरामध्ये जवळपास शेतकºयांनी पेरणीही केलेली नाही. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे पाऊस योग्य वेळी न झाल्यास विविध योजना सुरू करून त्या माध्यामतून पिकांना पाणी देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळ