शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

वाटाणा हातातून गेला; टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:05 IST

दुष्काळ अन् पुरंदर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे.

वाघापूर : दुष्काळ अन् पुरंदर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे. याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही, तसेच हातात आलेले हक्काचे वाटाणा हे पीक बाजारभावाअभावी कवडीमोल दराने विकावे लागत आहे. तर, विहिरीमध्ये पाणीच नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठाही आता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.कारण, या वर्षी एक-दोन नक्षत्रे वगळता बहुतेक सर्वच नक्षत्रांनी पावसाकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाबरोबरच व्यावसायिक, दुकानदार यांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवडमध्येही शुकशुकाट पसरला आहे.शेतकºयांनी मोठ्या कष्टाने शेती पिकविली. ज्यांना पाणी आहे, त्यांनी ठिबकच्या साह्याने पिकांना पाणी दिले; परंतु त्या पिकांना सध्या बाजारभावही चांगला मिळत नाही. परिणामी, केलेला खर्चही निघतो की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. वाटाणा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनपुरी, वाघापूर, गुरोळी, राजेवाडी, पारगाव, माळशिरस, पोंढे, नायगाव, पिसर्वे, सिंगापूर, राजुरी, रिसे-पिसे, आणि परिसरातील गावांमधील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.कमी पावसावर येणारे वाटणापीक आजही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने ते जळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी मजूर घेऊन भुईमूग, बाजरी, वाटाणा खुरपणी, तोडणी अशी कामे सुरू असून, अनेक ठिकाणी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांनी सायकल कोळपे हाती घेतले आहे. काही ठिकाणी कांदापिकासाठी आणि इतर पिकांसाठी वाफे तयार करणे, सरी ओढणे अशी कामे सुरू आहेत. मात्र, सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. सोनोरी, राजुरी या गावांमध्ये नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.पुरंदर उपसा योजना लवकरचकार्यान्वित होण्याची शेतकरी मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत. कारण, या माध्यामातून पिकांना जीवदान मिळाल्यास किमान दोन पैसे मिळवून खर्च तरी निघेल, अशी अपेक्षा आहे.पूर्व भागातील राजुरी आणि परिसरामध्ये जवळपास शेतकºयांनी पेरणीही केलेली नाही. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे पाऊस योग्य वेळी न झाल्यास विविध योजना सुरू करून त्या माध्यामतून पिकांना पाणी देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळ