शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 21:02 IST

मागील अनेक वर्षांपासून गुलदस्त्यात असलेला राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधातून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

पुणे : मागील अनेक वर्षांपासून गुलदस्त्यात असलेला राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधातून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. तसेच प्रयोगशाळा सहायक व अर्धवेळ ग्रंथपालांची पदेही कमी होणार आहेत. दरम्यान, हा आकृतीबंध संबंधित समितीच्या शिफारशींनुसार नसून शासनाने परस्पर त्यात बदल केल्याचा दावा शिक्षकेत्तर संघटनेने केला आहे. त्यामुळे या आकृतीबंधावरून शासनाविरोधात पुन्हा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यासाठी २०१५ मध्ये शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. याबाबतच्या उच्चस्तरीय समितीने आकृतीबंध निश्चित करण्याचा निर्णय १३ नोव्हेंबर २०१८ रोजी घेतला. त्यानंतर सोमवारी (दि. २८) शासनाने याबाबचा शासन निर्णय जारी करून हा आकृतीबंध लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लिपिकवर्गीय पदे, अधिक्षक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक यांची पदे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, यामधून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदांसंदर्भातील आकृतीबंधाबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.राज्यात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सुमारे ५० हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांच्या आकृतीबंधाची प्रतिक्षा अधिक होती. मात्र, शासनाने त्यांचाच आकृतीबंध मागे ठेवल्याने नाराजी निर्माण झाली आहे. या पदांमध्ये शिपाई, परिचर व नाईक यांचा समावेश होतो. त्यांचा आकृतीबंध जाहीर न करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केला आहे.

शासनाने समितीच्या अहवालात बदल करून आकृतीबंध तयार केला आहे. चतुर्थश्रेणी पदांचा आकृतीबंध मागे ठेवून संभ्रम निर्माण केला आहे. हा आकृतीबंध शाळांच्या हिताचा नाही. शासनाने पाठ थोपटून घेण्यासाठी हा आकृतीबंध निश्चित केला आहे. आगामी काळात याबाबत पुढील दिशा ठरविली जाईल.- शिवाजी खांडेकर, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांचे महामंडळ

अर्धवेळ ग्रंथपाल, अधिक्षक पदे रद्दअर्धवेळ ग्रंथपाल या पदावर सध्या १६०० कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. या पदांवर नवीन भरती किंवा पदनिर्मिती केली जाणार नाही. तसेच सध्या कार्यरत १७ अधिक्षकांच्या बाबतीतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही पदे संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच अस्तित्वात राहणार आहेत.

इयत्ता नववीच्या पुढेच प्रयोगशाळा सहायकसुधारित आकृतीबंधानुसार इयत्ता नववीच्या पुढे प्रयोगशाळा सहायकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार २०१ ते ७००, ७०१ ते १५०० आणि १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येसाठी प्रत्येकी एक सहायक असेल. पण शिक्षकेत्तर संघटनेच्या म्हणण्यानुसार, समितीने इयत्ता पाचवीच्यापुढे सहायकांची पदांची शिफारस केली होती. अनेक शाळांमध्ये केवळ इयत्ता नववी व दहावीत २०० विद्यार्थी नसतात. अशा शाळांना सहायक मिळणार नाहीत. तसेच पाचवी ते आठवीपर्यंत सहायकांचे काम कोणी करायचे, असाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा दावा संघटनेने केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणPuneपुणेGovernmentसरकार