शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या गुन्ह्यांमुळे हिरावला पासपोर्ट; गुन्हे मागे घेण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:41 IST

न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे...

- नितीन चौधरी

पुणे : कोरोना काळातील लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे अद्याप कायम असून राज्य सरकारने दोनदा घोषणा करूनही ते मागे घेण्यात आलेले नाहीत. परिणामी अनेक होतकरू तरुण, सामान्य नागरिक हतबल झाले असून त्यामुळे नोकरी तसेच पासपोर्टसाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. याबाबत दोषारोप पत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव संपत आल्यानंतर हे त्रासदायक गुन्हे माफ करावेत, अशी मागणी होत आहे. राज्य सरकारवरही हे गुन्हे माफ करण्याबाबत दबाव वाढत आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने २९ मार्च रोजी व सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने २० सप्टेंबर रोजी २१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंत लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात हे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अद्याप समितीच नेमली नाही

लॉकडाऊनमधील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रत्येक शहरातील उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने या सर्व गुन्ह्यांची व संबंधितांची तपासणी करून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करावयाचा होता. मात्र, राज्य सरकारने घोषणा करूनही अशी समितीची स्थापन करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारची ही घोषणा पोकळ आश्वासनच ठरली आहे. उपायुक्तांच्या समितीपुढे तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व गुन्हे ठेऊन त्यावर समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते. पुणे शहरातील ३२ पोलिस ठाण्यांत प्रत्येकी २ ते ४ हजार गुन्हे दाखल आहेत. समितीचा निर्णय न झाल्याने या सर्व गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबतचा दोषारोप पत्रांचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यावर न्यायालयच निर्णय घेईल, अशी माहिती पोलिस खात्यातील सूत्रांनी दिली. त्यामुळे हे गुन्हे अजूनही माफ झालेले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

पार्सपोर्टसाठी मिळेना पोलिसांचे प्रमाणपत्र

लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी नागरिकांवर पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट काढताना पोलिसांकडील गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र लागते. त्यामुळे केवळ लॉकडाऊनचा नियम तोडल्याचा १८८ कलमानुसारचा गुन्हा असलेले अर्ज पोलिसांकडे येत असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली. मात्र, गुन्हा दाखल असल्याने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात अडचण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ पासपोर्टच नव्हे तर नोकरीसाठीही असे गुन्हे अडथळे ठरत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले. आता ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांकडून न्यायालयात पुरेसे स्पष्टीकरण देऊन सरकारची बाजू मांडावी व गुन्हे मागे घेऊन सामान्यांना दिलासा द्यावा.

- विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र