शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पास झालेले विद्यार्थी 6 महिन्यानंतर नापास? पॉलिटेक्निक महाविद्यालयातील निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 13:00 IST

शासन निर्णयानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यानुसार शासकीय पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांचा निकाल ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झाला.

राहुल शिंदे 

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला.त्यात विद्यार्थ्यांना 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुण मिळाले तरी उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, तब्बल सहा महिन्यानंतर निकालात बदल करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता अनुत्तीर्ण केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

शासन निर्णयानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यानुसार शासकीय पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांचा निकाल ऑगस्ट महिन्यात प्रसिध्द झाला. परंतु, परीक्षेत 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुणांना उत्तीर्ण असल्याची  माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरली गेली.या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालासमोर 35 गुण व उत्तीर्ण (पी)असा शेरा आला. प्रत्यक्षात 40 पेक्षा कमी गुण असणा-या विद्यार्थ्यांच्या निकालासमोर अनुत्तीर्ण (एफ) शेरा येणे अपेक्षित होते.मात्र,निकाल प्रसिध्द केल्यानंतर ही बाब तंत्रनिकेतनच्या परीक्षा विभागाच्या लक्षात आली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला होता. तसेच आपण उत्तीर्ण आहोत असा समज त्यांनी करून घेतला होता. परंतु, परीक्षा विभागाला आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी निकाल रद्द केला. तसेच याबाबत संकेतस्थळावर व महाविद्यालयाच्या आवारात नोटीस प्रसिध्द केली.

शासकीय तंत्रनिकेततर्फे कोरोना काळात अंतिम वर्षाच्या सुमारे 1 हजार 150 विद्यार्थ्यांची तब्बल 170 विषयांची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यातील सुमारे 150 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.अंतिम वर्षाचा निकाल चांगला लागला असला तरी अंतिमपूर्व वर्षाच्या निकालात चूकीच्या पध्दतीने जाहीर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण कसे दाखवता,असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.मात्र,एका तांत्रिक चुकीमुळे निकालही चुकला असे तंत्रनिकेतनच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.काही कारणास्तव चुकीचा निकाल प्रसिध्द झाल्यास सहा महिन्यांपर्यंत त्यात दुरूस्ती करता येते,असे स्वायत्त महाविद्यालयाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे तांत्रिक कारणामुळे तंत्रनिकेतनकडून सुधारित निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या मार्च महिन्यात परीक्षा देता येणार आहे.-डॉ.विठ्ठल बांदल, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार