शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

देशातील महत्त्वाच्या घोटाळ्यांत संसदीय समित्यांचे झाले ' भजे ' : माधव गोडबोले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:17 IST

गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत.

ठळक मुद्देराष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदानदेशातील नागरिकांना याप्रकारच्या संसदीय समित्यांकडून अपेक्षा असताना त्यांचे अपयश खेदजनक

पुणे :  देशभरातील बोफोर्स, हर्षद मेहता बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रम घोटाळा मोठमोठ्या घोटाळ्यांकरिता ज्या मोठ्या समिता नेमण्यात आल्या त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न कुणी विचारत नाही. संसदीय समिती नेमायची, त्यानंतर चौकशी अहवाल, मात्र त्यातून फार काही साध्य होत नाही. राफेल प्रकरणी चर्चा केली जाते याचा अर्थ आपण निवडून दिलेल्या सरकारवर आपला विश्वास नाही का, तसेच गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. अशाप्रकारे संसदीय समित्यांचे भजे झाले आहे. अशी सणसणीत टीका संसद प्रक्रियेवर माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केली. राष्ट्रीय प्रतिष्ठानच्यावतीने टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधव गोडबोले यांनी भुषविले. याप्रसंगी परमवीर चक्रविजेते संजयकुमार यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर क्षेत्रातील निवडक विद्यार्थ्यांना शहर पातळीवरील चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, सरहदच्या विश्वस्त सुषमा नहार, अंकिता शहा, सुभाष मोहीते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  गोडबोले म्हणाले, बोफोर्सचा घोटाळा, हर्षद मेहता यांचा बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ही देशातील काही प्रमुख घोटाळ्यांची उदाहरणे यात देखील चौकशीकरिता संसदीय समिती नेमण्यात आली. मात्र कालांतराने तपास रेंगाळत गेल्याने त्या समितीकडून म्हणावा तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. देशातील नागरिकांना याप्रकारच्या समित्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असताना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल. त्यामुळेच संसदीय समितीचे भजे झाले आहे. असे म्हणावे लागते.  ज्यांना देशातील सर्वोच्च अशा पुरस्काराने गौरविण्यात आले अशा माजी राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधान संसदेला जबाबदार असतात. संसदीय समितीला नव्हे. त्यामुळे त्यांनी अशा समितीला सामोरे जाण्याची गरज नाही. यातून संसदीय समितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

* देशातील तरुणांना प्रेरित करायचे असेल तर त्यांना आपल्या सैनिकांच्या युध्दाचा गौरवशाली इतिहास समजून सांगावा लागेल. त्याची गरज आहे. राष्ट्रउभारणीकरिता त्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पिढीला हे सांगावे लागेल जेणेकरुन त्यांच्यात देशभक्ती जागृत होण्यास मदत होईल. देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण होण्याकरिता इतिहासाचे स्मरण हवेच. असे मत विर्क यांनी व्यक्त केले.   

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfraudधोकेबाजीParliamentसंसद