शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

बुद्ध्यांक कमी असल्याचे सांगून मुलीला शाळेतून काढल्याची पालकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 03:33 IST

आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे.

महाळुंगे : आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. या संदर्भात शाळेने मात्र सदर विद्यार्थिनीला शाळेतून काढले नसून तिचा बुद्ध्यंक इतर मुलांपेक्षा कमी असल्याने पालकांना मराठी शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट केले आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी : यशस्वी अंकुश भोसले ही विद्यार्थिनी बाल शिक्षण हक्कअंतर्गत ६ वर्षांपासून द्वारका स्कूल महाळुंगे येथे शिक्षण घेत आहे. ती इयत्ता चौथीत शिकते.पालकांनी या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझ्या मुलीला शाळेतून काढण्यात आले आहे. शाळेच्या या निर्णयामुळे माझ्या मुलीची वेळ आणि वर्ष वाया जाणार आहे. तिच्यावर घरी राहण्याची नामुष्की ओढवली आहे. तिला दुसऱ्या खासगी शाळेत प्रवेश घेणे कसोटीचे आहे. शाळेने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मला व माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. माझ्या मुलीला काही येत नाही, हे शाळेला तब्बल ६ वर्षांनी कळले का? असा सवालही करण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षण द्यायचे सोडून विचित्र वागणूक देत आहेत.या संदर्भात शाळा प्रशासनाने सांगितले, की तिला विशेष शिक्षक देऊन शिकवणी घेत आहोत. विद्यार्थिनीला इंग्लिश अभ्यासक्रम समजण्यास त्रास होतो. तिला एक प्रकारचा मानसिक तणाव येतो. त्यामुळे पालकांना आम्ही वारंवार ३ वर्षांपासून सूचना करूनही त्यांनी मुलीची बुद्धिमत्ता चाचणी केली नाही. यावर शाळने विनंती करून तिला जबरदस्तीने पालकांच्या सोबत पाठविले व आयक्यू तपासणीसाठी पैसे देऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. तपासणी अहवालानुसार पालकांना सांगितले, की तिला या अभ्यासक्रमाचा ताण येतो. तिची अभ्यासामध्ये सुधारणा करायची असेल, तर तिला समजणाºया मराठी शाळेत तुम्ही तिला टाका. आम्ही शिकवायला तयार आहोत; परंतु तिचे नुकसान नको! आपल्याला समजल्यावर वेळ निघून गेलेली असेल तरीदेखील पालक हे ऐकत नसून शाळेविरोधात चुकीची तक्रार करीत आहेत. शाळेने त्या मुलीला शाळेतून काढले नाही, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.माझ्या मुलीला शाळेला बालशिक्षण हक्कानुसार मोफत शिक्षण द्यायचे नाही; त्यामुळे शाळा खोटारडे आरोप करून दुसºया शाळेत शिक्षण घ्यायला सांगत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी गप्प बसणार नाही. शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेणार आहे.-अंकुश भोसले, विद्यार्थिनीचे वडीलशाळेने यशस्वीला काढून टाकले नाही. ती शाळा चालू झाल्यापासून शाळेत येत नाही. तिचे नाव हजेरी पुस्तकावर आहे; पण आम्ही पालकांना योग्य सल्ला दिला होता. ते समजून घेत नाहीत. आम्ही ६४ मुले बालशिक्षण हक्कातून शिकवत आहोत. एका विद्यार्थ्याने आम्हाला काहीच अडचण नाही. या वर्षी आरटीईमधून मुले कमी होती, तर आम्ही पंचायत समितीकडून नवीन प्रवेश घेतले आहेत.- स्वाती आंबरे, मुख्याध्यापिका द्वारका स्कूल

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र