शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 11:14 IST

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..!

अमोल अवचिते

सासवड - भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..! गावातील नागरिक दरवर्षी आळंदीहुन पंढरपूरला जात असत. वारीहून ते आले की, गावातील सगळ्या मंडळींसोबत मीही त्यांच्या भेटीला जात. चेहऱ्यावरील आनंद, उत्साह पाहून नेमके वारीत यांना काय भेटले असेल, असा विचार नेहमी मनात उभा राहत.. पण त्यांना हा प्रश्न विचारला की ते 'काय भेटते हे शब्दात सांगता येणं एवढं सोपं नाही,  तू स्वतः एकदा वारीला येऊन अनुभव घे' मग समजेल असे ऐकवत असत.. मग मनाशी एकदा तरी वारी करायचीच हा निश्चय करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झालो आणि विठु माऊलीचा लागला लळा, काय सांगू पंढरी महिमा...फलटणचे अरुण ननावरे यांचा हा अनुभव...

सासवड ठायी माऊलींचा मुक्काम असताना रात्री ननावरे यांच्याशी भेट झाली अन् हा आठवणींचा आणि विठू माऊलींच्या वात्सल्याचा पान्हा रिक्त केला.. ते सांगतात... घरच्या अडचणी, काळजीमुळे मी घराबाहेर पाय ठेवला नाही. साडेतीन एकराची शेती आहे. शेतात पिकलं तर पिकलं नाही तर  जळून गेलं, अशा अवस्थतेत आला दिवस ढकलत होतो... मात्र, वयाच्या ३६ व्या वर्षी २००३ ला मला वारीला जावं असं वाटलं.... सुरुवातीला शंभर लोकांसह वारीला ते आले. आता संख्या वाढली आहे. पहिल्या वर्षी हरिपाठ पाठ नव्हते. म्हणून वारीत काय चालले आहे ते समजत नसत... पण जसजशी पालखी पुढे जात होती, तसा उत्साह वाढत होता आणि चिंता मिटत गेली... वारीत चालताना आनंद वाटायला लागला. पूर्वीपेक्षा सध्या वारीत तरुण पोरा पोरींची संख्या वाढली आहे... जणू त्यांना ही विठुमाऊलीने भक्तीचा टिळा लावला आहे... तसेच आमच्या आरोग्याची काळजी घेत चांगल्या सोयी सुविधा देखील दिल्या जात आहे. हरिपाठ, अभंग आता तोंडपाठ झाले आहेत.  हरिनामाच्या घोषाने वारीत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. घरची काळजी, आठवण येत नाही.

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर               चालला नामाचा गजर...  तीन मुलांचे इंजिनिअरिंग झाले आहेत. ते पुण्याला नोकरीला आहेत. ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर भक्तांचे वर्णन करताना म्हणतात 'तो पहिला आर्तु म्हणिजे! दुसरा जिज्ञासू बोलिजे| तिजा अर्थार्थी जाणिजे| ज्ञानिया चौथा' मनोभावे भक्ती करणारा भक्त आणि याचक भक्तामधला सूक्ष्म फरक माऊलींनी सांगितला आहे. पांडुरंगाकडे काही मागायचं नाही, काही मिळवायचं नाही, कसली लालसा नाही केवळ नामस्मरणाने भेदाभेदरुपी अहंकार दूर करून परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य असते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक