शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 11:14 IST

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..!

अमोल अवचिते

सासवड - भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..! गावातील नागरिक दरवर्षी आळंदीहुन पंढरपूरला जात असत. वारीहून ते आले की, गावातील सगळ्या मंडळींसोबत मीही त्यांच्या भेटीला जात. चेहऱ्यावरील आनंद, उत्साह पाहून नेमके वारीत यांना काय भेटले असेल, असा विचार नेहमी मनात उभा राहत.. पण त्यांना हा प्रश्न विचारला की ते 'काय भेटते हे शब्दात सांगता येणं एवढं सोपं नाही,  तू स्वतः एकदा वारीला येऊन अनुभव घे' मग समजेल असे ऐकवत असत.. मग मनाशी एकदा तरी वारी करायचीच हा निश्चय करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झालो आणि विठु माऊलीचा लागला लळा, काय सांगू पंढरी महिमा...फलटणचे अरुण ननावरे यांचा हा अनुभव...

सासवड ठायी माऊलींचा मुक्काम असताना रात्री ननावरे यांच्याशी भेट झाली अन् हा आठवणींचा आणि विठू माऊलींच्या वात्सल्याचा पान्हा रिक्त केला.. ते सांगतात... घरच्या अडचणी, काळजीमुळे मी घराबाहेर पाय ठेवला नाही. साडेतीन एकराची शेती आहे. शेतात पिकलं तर पिकलं नाही तर  जळून गेलं, अशा अवस्थतेत आला दिवस ढकलत होतो... मात्र, वयाच्या ३६ व्या वर्षी २००३ ला मला वारीला जावं असं वाटलं.... सुरुवातीला शंभर लोकांसह वारीला ते आले. आता संख्या वाढली आहे. पहिल्या वर्षी हरिपाठ पाठ नव्हते. म्हणून वारीत काय चालले आहे ते समजत नसत... पण जसजशी पालखी पुढे जात होती, तसा उत्साह वाढत होता आणि चिंता मिटत गेली... वारीत चालताना आनंद वाटायला लागला. पूर्वीपेक्षा सध्या वारीत तरुण पोरा पोरींची संख्या वाढली आहे... जणू त्यांना ही विठुमाऊलीने भक्तीचा टिळा लावला आहे... तसेच आमच्या आरोग्याची काळजी घेत चांगल्या सोयी सुविधा देखील दिल्या जात आहे. हरिपाठ, अभंग आता तोंडपाठ झाले आहेत.  हरिनामाच्या घोषाने वारीत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. घरची काळजी, आठवण येत नाही.

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर               चालला नामाचा गजर...  तीन मुलांचे इंजिनिअरिंग झाले आहेत. ते पुण्याला नोकरीला आहेत. ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर भक्तांचे वर्णन करताना म्हणतात 'तो पहिला आर्तु म्हणिजे! दुसरा जिज्ञासू बोलिजे| तिजा अर्थार्थी जाणिजे| ज्ञानिया चौथा' मनोभावे भक्ती करणारा भक्त आणि याचक भक्तामधला सूक्ष्म फरक माऊलींनी सांगितला आहे. पांडुरंगाकडे काही मागायचं नाही, काही मिळवायचं नाही, कसली लालसा नाही केवळ नामस्मरणाने भेदाभेदरुपी अहंकार दूर करून परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य असते.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक