शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 22:05 IST

आळंदी ते वाखरी विनाथांबा प्रवास; दीड किमी होणार पायीवारी

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका सोमवारी (दि.१९) सकाळी नऊच्या सुमारास आळंदीतील आजोळघरातून पंढरपूरला प्रस्थान ठेवतील. दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस व्यक्तींसोबत विनाथांबा ही वारी वाखरीपर्यंत नेण्यात येणार आहे. दरम्यान वारीच्या प्रवास मार्गांवर गावोगावी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून संपूर्ण वारी ने - आण करण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवनेरी बसचे सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शीरसाठ  व रामचंद्र नामदेव ईधारे हे करणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत.

या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चलपादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून दोन शिवनेरी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बसमध्ये प्रत्येकी वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत पासष्ट वर्षांच्या आतील निमंत्रित व्यक्तीला प्रवेश दिला जाणार असून संबंधित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली असल्याची माहिती सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे - पाटील यांनी दिली.

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड - १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. कालाच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर पौर्णिमेच्या (दि. २३) दिवशी वारी परतीसाठी आळंदीकडे प्रस्थान ठेवेल.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्या