शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

पावसाअभावी भातशेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 02:00 IST

शेतकरीवर्ग धास्तावला, अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव

डिंभे : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भातउत्पादक क्षेत्र असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पंचमीपासून पावसाने काढता पाय घेतल्याने भातशेती संकटात सापडली आहे.पावसाच्या अभावाबरोबरच अनेक ठिकाणी भातपिकाला रोगाची लागण झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. भातपीकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. अनेक ठिकाणी भात शिवार पिवळी पडू लागली आहेत.जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पुरंदर या तालुक्यांत सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. जून-जुलैत चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी जोमाने भातपिकाची लागवण केली. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. आॅक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम जातीच्या भातशेतीचा सुगंध परिसरात दरवळत असतो.३ आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने भातखाचरामधील पाणी हळूहळू आटून गेले. सर्वत्र भात खाचरे कोरडी पडल्याचे चित्र दिसत आहे. खाचरांत पाणीच नसल्याने सध्या लागवड केलेल्या भातशेतीचे शेंडे पिवळे पडू लागले आहेत. काही ठिकाणी भातशेतीला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. भातशेती चांगली पिकणार, ही आशा बाळगून असलेल्या शेतकरीवर्गाच्या मनात अपुरा पाऊस आणि करपा रागाची झालेली लागण यामुळे चिंतेचे ढग जमा झाले आहेत.आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण, आहुपे व भीमाशंकर खोºयात जवळपास ८० टक्के शेतकरी गरव्या जातीची भातशेती करत असल्याचे पाहावयास मिळते. मात्र या तालुक्यात ३ आठवड्यापासून पाऊस गायब आहे. यामुळे भातशेती अडचणीत सापडली आहे. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे.अनेक तालुक्यांतील भातपिकांना फटकापेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्य वेळी तयार झाली होती. पावसाचा अंदाज येताच शेतकºयांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या होत्या. पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागल्याचे बोलले जात होते. पुढे पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे भात लगावडीसाठी कोठेही खोळंबा वा विलंब झाला नाही. लागवड वेळेत उरकल्याने भातउत्पादक शेतकºयांच्या चेहºयावर समाधान होते. मात्र हे पीक ऐन भरात असतानाच जुन्नर, आंबेगांव, खेड तालुक्यासह सर्वत्रच पावसाने काढता पाय घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस