शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:26 IST

हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे.

बारामती : हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे द्राक्ष, डाळिंब बागांवर आता परिणामझाला होता. मात्र योग्य नियोजनामुळे शेतकºयांनी याही संकटावर मातकेली आहे.बाजारात द्राक्षाचे दर चढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.उसाचे आगार म्हणून ओळखले गेलेल्या बारामती-इंदापूर तालुक्यांच्या बागायती पट्ट्यात द्राक्ष बागांनी क्षेत्र व्यापले आहे, तर जिरायती भागाला वरदान ठरलेल्या डाळिंबाने येथील शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावला. मात्र द्राक्ष बागांना सातत्याने अवकाळी पावसाचा व खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षीदेखील लांबलेल्या पावासाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला होता. त्यातूनही शेतकºयांनी मेहनतीने बागा जपल्या होत्या. मात्र मागील आठवड्यातील अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची झोप उडवली होती. आगाप बागांमध्ये मणी फुटण्याचे प्रकार घडले तर उशिरा छाटण्या केलेल्या बागांमध्ये डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र शेतकºयांनी दिवसरात्र एक करून बागा रोगांपासून वाचवल्या आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या एकरी उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र द्राक्षांचे बाजारही तेजीत असल्याने आता अवकाळीचा फेरा नको अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे.गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील माल आखाती देशात दरवर्षी निर्यात होत असतो. या भागातील काझड, लासुर्णे, बिरंगुडी, कळस आदी गावांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत असतो.नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, माणिक चमन, एसएस, आरके, शरद सिडलेस या जातींच्या द्राक्षांना आखाती देशात मोठी मागणी असते. सध्या ‘शरद सिडलेस’ या जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १०० ते ११० रुपये दर मिळत आहे. तर नारायणगाव जम्बो जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत निर्यातदार दर देत आहेत.बाजारात द्राक्षाचे दरचढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको,अशी प्रार्थना शेतकरी करीतोयमाझ्या बागेची उशिरा छाटणी केली आहे, अवकाळी पावसामुळेधास्ती होती. मात्र नियमित फवारण्या व योग्य काळजी घेतल्याने आता बागेमध्ये रोग दिसत नाही. द्राक्षाचा बाजार असाच तेजीत राहिल्यास शेतकºयांच्या मेहनतीचे चिज होणार आहे.- दादासाहेब सांगळेद्राक्ष उत्पादक शेतकरी,बिरंगुडी-कळस

टॅग्स :Farmerशेतकरी