शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

विमानतळाला आमचा विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 2:25 AM

बाधित शेतकऱ्यांनी दिला इशारा; जबरदस्ती केली तर रक्त सांडावे लागेल

वाघापूर : ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची...’ अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर; पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल, तर आमचे रक्त सांडावे लागेल, असा इशारा बाधित गावांतील शेतकºयांनी शासनाला दिला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर व कुंभारवळण या ७ गावांमधील २,८३२ हेक्टरवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच, शासनाने बहुतेक सर्वच परवानग्या मिळविल्या असून मागील आठवड्यात प्रत्येक गावांमधील कोणकोणत्या दिशेचे क्षेत्र जाणार आहे, त्यांचे गट नंबर प्रसिद्ध केले. त्यामुळे आमच्याबरोबर शासनाने कोणतीही चर्चा न करता गट नंबर जाहीर केलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामसभा घेऊन शासनाचा जोरदार निषेध केला आहे.वनपुरी येथे सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २४) ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन जोरदारनिषेध केला.या वेळी उदाचीवाडीचे सरपंच संतोष कुंभारकर, सोसायटी चेअरमन किसन कुंभारकर, वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर, विमानतळविरोधी संघर्ष समितीचे सदस्य संतोष हगवणे सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, चंद्रकांत झेंडे, बबन कुंभारकर, संजय कुंभारकर, प्रकाश गायकवाड, बापू कुंभारकर, विकास कुंभारकर, काकासो कुंभारकर, तसेच वनपुरी, उदाचीवाडी, हगवणेवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, विमानतळ प्रकल्पाच्या एक-एक घोषणा होत असताना स्थानिक ग्रामस्थांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात शासनाविरोधात तीव्र असंतोष उफाळून येत असल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वीच कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, खानवडी तसेच मुंजवडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन शासनाचा जोरदार निषेध केला आहे. अनेक शेतकºयांनी याबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आमच्या जागेत विमानतळ प्रकल्प उभारत असताना शासनाने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणे