शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

....अन्यथा सोमेश्वर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:05 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाला रीतसर पत्र देऊन ऊस दराबाबत अध्यक्ष व संचालक मंडळाची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जर संचालक मंडळाने पुन्हा भेटणे टाळले तर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (दि. ११) रोजी सोमेश्वर कारखान्याला भेट दिली. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सुप्रिया सुळे आणि शेतकरी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे. याबाबत सुळे या संचालक मंडळाची चर्चा करणार होत्या; मात्र संचालक मंडळातील एकही सदस्य चर्चेदरम्यान उपस्थित नव्हता. सुप्रिया सुळे यांनी पुढील पंधरा दिवसांत आपण पुन्हा अध्यक्ष आणि संचालक मंडळाला पत्र देत बैठक घेऊ, असे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार, पक्षाचे नेते युगेंद्र पवार, तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, उद्योजक राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले, वनिता बनकर यांच्यासह अधिकारी कालिदास निकम, दीपक निंबाळकर, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, शेतकरी सभासद उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर खासदार सुळे यांच्या या दौऱ्याला महत्त्व होते; मात्र सोमेश्वरच्या संचालकांनी सुळे यांच्या दौऱ्याकडे येणे टाळले.  

कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी शेतकरी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. साखर विक्री मूल्यांकनानुसार झाली आहे. बँकेची उचल २४१० रुपये उपलब्ध झाली आहे. इतर उत्पादनातून ३९० रुपये दिले आहेत. गेल्यावर्षीचा ३५७१ रुपये दर ताळेबंदानुसार दिला होता. आता दिलेला दर अंतिम नसून अजूनही कारखाना बंद झाल्यावर ३५० रुपये देण्यात येणार आहेत.

संचालक मंडळाची ३१०० रुपये दर देण्याची इच्छा होती; मात्र आर्थिक स्थिती समोर ठेवून दर दिला असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. अनेक संघटनांनी ३३०० देण्याची मागणी केली होती, मात्र सर्व परिस्थिती पाहता दिलेला दर योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुळे आणि शेतकरी सभासदांनी केलेल्या मागण्या संचालक मंडळ समोर मांडल्या जातील, असे आश्वासन राजेंद्र यादव यांनी दिले.

राजेंद्र जगताप यावेळी बोलताना म्हणाले की, पहिली उचल सोसायटीचे कर्ज फेडण्यासाठी जाते. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो. गतवर्षी दर बसत नसताना दिला गेला; मात्र चालूवर्षी कमी दर देऊन सभासदांची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला. अनेक सभासदांनी ऊस जाळून आणला जातो, टेंडर ऑनलाइन करावेत, गेटकेन ऊस आणू नये सभासदांच्या उसाला प्राधान्य द्यावे, जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यावे मात्र सभासदांना योग्य दर द्यावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामतीsugarcaneऊसSharad Pawarशरद पवार