शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

आदेश! पूरग्रस्तांच्या मागण्या विचारात घेऊन अहवाल सादर करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 02:41 IST

खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटून दांडेकर पूल, जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात झालेली दुर्घटना गंभीर आहे. पुणे महापालिका

पुणे : खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटून दांडेकर पूल, जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात झालेली दुर्घटना गंभीर आहे. पुणे महापालिका, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एकत्रित बैठक घेऊन पूरग्रस्तांच्या मागण्या विचारात घ्याव्यात आणि अहवाल सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (दि. १२) होणार आहे.

खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा २७ सप्टेंबरला फुटला होता. त्यावेळी दांडेकर पूल, जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरातील घरांना मोठा फटका बसला असून, नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवाजी गदादे, प्रिया गदादे यांनी अ‍ॅड. विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेमध्ये पुणे महापालिका, मुख्य अभियंता पुणे पाटबंधारे सर्कल, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, तहसीलदार हवेली, राज्याचे मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन विभाग, केंद्र शासन, रिलायन्स केबल्स व कंडक्टर प्रा. लि., व्होडाफोन कंपनी, एअरटेल कंपनी, कोया कन्स्ट्रक्शन यांना या याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे.

याप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर शुक्रवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पूरग्रस्त लोकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, त्यांना दररोज जेवणाची व्यवस्था करावी, महिलांना सॅनिटरी नॅपकीन पुरवावे, मुलांना शैक्षणिक पुस्तके आणि इतर साहित्य द्यावे, असा आदेश न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती गिरीश पटेल यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉ. यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर १२ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे