शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालखी महामार्गावरील लासुर्णेच्या नियोजित उड्डाणपूल उभारणीला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:04 IST

बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे...

लासुर्णे (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी लासुर्णे येथे तीन उड्डाणपूल नियोजित आहेत. या पुलांमुळे दोन भागात गाव विभागले जाणार आहे. येथील व्यवसाय कोलमडणार असल्याने ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाला विरोध दर्शवला आहे. संपूर्ण गावासह महिला, लहान मुलांसह रस्त्यावर उतरत आमरण उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.

लासुर्णे (ता. इंदापूर)येथील ऋतुजा पेट्रोलपंपावर पालखी मार्गाच्या अडीअडचणी संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी हा इशारा दिला. बंदिस्त उड्डाणपुलामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाताना अगदी अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरून वळसा घालून जावे लागणार आहे. लासुर्णे गाव हे बारा वाड्या आणि तेरा गावे अशा गावांचा व्यवहार बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी पतसंस्था व विविध कार्यकारी संस्था अशा अनेक संस्थांचे जाळे या गावात आहे. या सर्वांवर परिणाम होणार असल्याचे सांगत पुलाला विरोध करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षा विभागाच्या अधिकारी उमादेवी यांनी सांगितले की या महामार्गाचा सर्व्हे २०१८ मध्ये करण्यात आला आहे. यात २०३० पर्यंतची लोकसंख्या तसेच नवीन वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तसेच चिखली, कुरवली कळंब व बोरी आदी गावातील नागरिक लासुर्णे गावातून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ व वाहनांच्या रांगा लागतील. भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढेल हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून तीन उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

यावर सरपंच पाटील यांनी सांगितले की चिखली कुरवली गावातील नागरिक बी.के.बी. एन. मार्गे पंढरपूर तसेच बारामती या ठिकाणी जातील. तसेच कळंब गावातील नागरिक सुद्धा त्याच मार्गाने जातील. त्याचप्रमाणे बोरी गावातील नागरिकांसाठी भवानीनगर तसेच बारामतीस जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे. या चारही गावातील नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी लासुर्णेत येण्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे या रस्त्यावर त्या नागरिकांची गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाही. या सर्व कारणामुळे आमच्या गावातील उड्डाणपूल हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने केल्याचे सांगितले.

हा पालखी महामार्ग झाला पाहिजे. महामार्गामुळे गावाचा विकास होतो. हे जरी खरे असले तरी या गावातील तीन उड्डाणपुलांमुळे गावचे गावपण हरवले जाणार आहे. गाव दोन भागात विभागले जाणार आहे. अनेकांचे व्यवसाय अडचणीत येणार आहेत. यासाठी प्रशासनाला आमची गावकऱ्यांच्यावतीने उड्डाणपूल रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तसेच नॅशनल हायवे महामार्गाचे सर्व अधिकारी यांच्याकडे केली. भविष्यात तो उड्डाणपूल रद्द न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा सरपंच रुद्रसेन पाटील यांनी दिला. तर ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.

... चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो,

ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना चित्रगुप्त जे लिहितो, ते इंद्रदेव करतो, या आशयाप्रमाणे तुम्ही फक्त कागदावर आमच्या मागणीबाबत लिहा, ते आपोआप होऊन जाईल,अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यावर नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा