शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

पुणे व पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला आजही विरोध कायम : आमदार दिलीप मोहिते पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:19 IST

अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल

ठळक मुद्देचासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार

राजगुरुनगर: भामा आसखेड धरणातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पाणी द्यायला आपला विरोध पूवीर्ही होता; तो आजही कायम आहे.  चासकमान धरणामधून सुध्दा पीएमआरडीए पुणे परिसरात पाणी नेणार आहे.तालुक्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.जमिनी धरणात गेल्या त्या उर्वरीत शेतकऱ्यांचे संपूर्ण पुनर्वसन,पूर्वी पुनर्वसन झाले तेव्हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांना जमिनी द्याव्या लागल्या आणि ज्यांना मिळाल्या त्या भागात शेतीला पाणी, त्याचबरोबर चाकण एमआयडीसी,सेझ मुळे तालुक्यात वाढणाऱ्या लोकसंखेला भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही एवढे पाणी शिल्लक राहण्याचे स्पष्ट धोरण सरकारने राबवावे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.

मोहिते पाटील म्हणाले ,भामाआसखेड धरणाची ८.१४ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.त्यातील पुण्याला २.६५ टीएमसी,पिंपरी-चिंचवडला २ टीएमसी पाणी नेण्याचे धोरण राबवले जात आहे.धरणातून चाकण शहर,एमआयडीसी,आळंदी असे पाणी वाटप यापूर्वीच झालेले आहे.चाकण व सेझमध्ये कारखानदारी वाढल्याने चाकण,राजगुरुनगर,आळंदी या शहर परिसरात रहदारीत वाढ होत आहे.लोकसंख्या वाढता असताना शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यात देखील उभे राहणार आहे.याचा विचार कोणीही करीत नाही.म्हणून आपला सरकारच्या पाणी वाटप धोरणाला थेट विरोध आहे.पिंपरी चिंचवडला आपण पाणी नेऊ देणार नाही. 

धरण क्षेत्र आणि चाकण व त्यापुढील पूर्व भागात मोठे शेती क्षेत्र आहे.याच भागात धरणग्रस्तांसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित करून वाटप केले गेले. शेतीसाठी पाणी दिले जाईल असे प्रकल्प होताना सांगण्यात आले होते.प्रत्यक्षात येथे जाणारा धरणाचा कालवाच रद्द झाला आहे.लोकं कर्ज काढून नदी पात्रातून अनेक किलोमीटर सिंचन योजना करून पाणी नेत आहेत. अशा स्थितीत मात्र सरकार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य या गोंडस नावाखाली पुणे,पिंपरी-चिंचवडला पाणी नेत आहे याला आपला तीव्र विरोध आहे.

चासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे.राजगुरुनगर शहर,सेझ व परिसरातील वाढत्या नागरीकरणासाठी तेवढे पाणी आरक्षित करूनच शिरूरला पाणी दिले जावे यासाठी यापुढील काळात आपला संघर्ष राहील असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

.......................................................    चाकण एमआयडीसी पाचवा टप्पा आणि भामा आसखेड धरणाग्रस्तांची नुकसानभरपाई रक्कम लॉकडाऊन पूर्वी जमा झालेली आहे.पाचव्या टप्यातील आदिवासी बांधवांचे सुमारे एक हजार कोटी आणि भामा आसखेड धरणग्रस्तांचे ३५० कोटी रुपये आहेत.कोरोनाच्या संकट काळात लोकाना हे हक्काचे पैसे मिळाले असते तर अनेकाना आधार मिळाला असता.केवळ अधिकारी वर्गाच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे घडू शकले नाही.हातात असलेले काम होत नाही.मात्र दुसऱ्या भागात पाणी नेण्याचे नियोजन तातडीने राबविले जाते. हा दुजाभाव सहन करणार नाही. - दिलीप मोहिते पाटील (आमदार, खेड तालुका ) 

टॅग्स :KhedखेडWaterपाणीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी