शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पुणे व पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला आजही विरोध कायम : आमदार दिलीप मोहिते पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:19 IST

अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल

ठळक मुद्देचासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार

राजगुरुनगर: भामा आसखेड धरणातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पाणी द्यायला आपला विरोध पूवीर्ही होता; तो आजही कायम आहे.  चासकमान धरणामधून सुध्दा पीएमआरडीए पुणे परिसरात पाणी नेणार आहे.तालुक्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.जमिनी धरणात गेल्या त्या उर्वरीत शेतकऱ्यांचे संपूर्ण पुनर्वसन,पूर्वी पुनर्वसन झाले तेव्हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांना जमिनी द्याव्या लागल्या आणि ज्यांना मिळाल्या त्या भागात शेतीला पाणी, त्याचबरोबर चाकण एमआयडीसी,सेझ मुळे तालुक्यात वाढणाऱ्या लोकसंखेला भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही एवढे पाणी शिल्लक राहण्याचे स्पष्ट धोरण सरकारने राबवावे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.

मोहिते पाटील म्हणाले ,भामाआसखेड धरणाची ८.१४ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.त्यातील पुण्याला २.६५ टीएमसी,पिंपरी-चिंचवडला २ टीएमसी पाणी नेण्याचे धोरण राबवले जात आहे.धरणातून चाकण शहर,एमआयडीसी,आळंदी असे पाणी वाटप यापूर्वीच झालेले आहे.चाकण व सेझमध्ये कारखानदारी वाढल्याने चाकण,राजगुरुनगर,आळंदी या शहर परिसरात रहदारीत वाढ होत आहे.लोकसंख्या वाढता असताना शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यात देखील उभे राहणार आहे.याचा विचार कोणीही करीत नाही.म्हणून आपला सरकारच्या पाणी वाटप धोरणाला थेट विरोध आहे.पिंपरी चिंचवडला आपण पाणी नेऊ देणार नाही. 

धरण क्षेत्र आणि चाकण व त्यापुढील पूर्व भागात मोठे शेती क्षेत्र आहे.याच भागात धरणग्रस्तांसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित करून वाटप केले गेले. शेतीसाठी पाणी दिले जाईल असे प्रकल्प होताना सांगण्यात आले होते.प्रत्यक्षात येथे जाणारा धरणाचा कालवाच रद्द झाला आहे.लोकं कर्ज काढून नदी पात्रातून अनेक किलोमीटर सिंचन योजना करून पाणी नेत आहेत. अशा स्थितीत मात्र सरकार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य या गोंडस नावाखाली पुणे,पिंपरी-चिंचवडला पाणी नेत आहे याला आपला तीव्र विरोध आहे.

चासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे.राजगुरुनगर शहर,सेझ व परिसरातील वाढत्या नागरीकरणासाठी तेवढे पाणी आरक्षित करूनच शिरूरला पाणी दिले जावे यासाठी यापुढील काळात आपला संघर्ष राहील असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

.......................................................    चाकण एमआयडीसी पाचवा टप्पा आणि भामा आसखेड धरणाग्रस्तांची नुकसानभरपाई रक्कम लॉकडाऊन पूर्वी जमा झालेली आहे.पाचव्या टप्यातील आदिवासी बांधवांचे सुमारे एक हजार कोटी आणि भामा आसखेड धरणग्रस्तांचे ३५० कोटी रुपये आहेत.कोरोनाच्या संकट काळात लोकाना हे हक्काचे पैसे मिळाले असते तर अनेकाना आधार मिळाला असता.केवळ अधिकारी वर्गाच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे घडू शकले नाही.हातात असलेले काम होत नाही.मात्र दुसऱ्या भागात पाणी नेण्याचे नियोजन तातडीने राबविले जाते. हा दुजाभाव सहन करणार नाही. - दिलीप मोहिते पाटील (आमदार, खेड तालुका ) 

टॅग्स :KhedखेडWaterपाणीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी