शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गावांमध्ये क्रीडा अकादमी सुरू होणे पॅरा खेळाडूंसाठी गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:38 IST

भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : आमच्या काळात गावांमध्ये खेळांसाठी उत्कृष्ट सुविधा नव्हत्या आणि आताही पॅरा खेळाडूंसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच शहरांबरोबरच ग्रामीण भागातही क्रीडा अकादमी सुरू होणे गरजेचे आहे, असे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.

जर्मनीत १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर ५२ वर्षांनंतर पेटकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तीन विश्वविक्रमांची नोंद केली. या कामगिरीसह ते पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे भारताचे पहिले खेळाडू ठरले होते.

महाराष्ट्रात १९४४ मध्ये जन्मलेल्या पेटकर यांनी सांगितले, हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. पण गावांमध्ये आताही शहरांप्रमाणे खेळांसाठी गरजेच्या सुविधा मिळत नाहीत. त्यात पॅरा खेळाडूंचा विशेष उल्लेख करावा लागेल. माझ्या काळात गावांमध्ये सुविधा नव्हत्या. आताही ज्या क्रीडा अकादमी बांधल्या जात आहेत त्या शहरांमध्ये बांधल्या जात आहेत. गावांमध्येही अकादमी बांधा. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की अशा उत्कृष्ट सुविधा गावांमध्येही असायला हव्यात.

...म्हणून खेळाडूंकडून जागतिक विक्रम

पूर्वी, जर प्रशिक्षक चांगला असेल तर खेळाडू चांगला नसायचा. जर खेळाडू चांगला असेल तर प्रशिक्षक चांगला नव्हता. पण आता प्रशिक्षक आणि खेळाडू दोघेही चांगले आहेत. सर्वजण सुशिक्षित आहेत, मोठमोठी स्टेडियम आहेत, जिथे चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे, तिथे चांगला प्रशिक्षक दिला जातो, म्हणूनच मुले जागतिक विक्रम करत आहेत, असेही पेटकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा