शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गावांमध्ये क्रीडा अकादमी सुरू होणे पॅरा खेळाडूंसाठी गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:38 IST

भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : आमच्या काळात गावांमध्ये खेळांसाठी उत्कृष्ट सुविधा नव्हत्या आणि आताही पॅरा खेळाडूंसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच शहरांबरोबरच ग्रामीण भागातही क्रीडा अकादमी सुरू होणे गरजेचे आहे, असे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.

जर्मनीत १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर ५२ वर्षांनंतर पेटकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तीन विश्वविक्रमांची नोंद केली. या कामगिरीसह ते पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे भारताचे पहिले खेळाडू ठरले होते.

महाराष्ट्रात १९४४ मध्ये जन्मलेल्या पेटकर यांनी सांगितले, हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. पण गावांमध्ये आताही शहरांप्रमाणे खेळांसाठी गरजेच्या सुविधा मिळत नाहीत. त्यात पॅरा खेळाडूंचा विशेष उल्लेख करावा लागेल. माझ्या काळात गावांमध्ये सुविधा नव्हत्या. आताही ज्या क्रीडा अकादमी बांधल्या जात आहेत त्या शहरांमध्ये बांधल्या जात आहेत. गावांमध्येही अकादमी बांधा. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की अशा उत्कृष्ट सुविधा गावांमध्येही असायला हव्यात.

...म्हणून खेळाडूंकडून जागतिक विक्रम

पूर्वी, जर प्रशिक्षक चांगला असेल तर खेळाडू चांगला नसायचा. जर खेळाडू चांगला असेल तर प्रशिक्षक चांगला नव्हता. पण आता प्रशिक्षक आणि खेळाडू दोघेही चांगले आहेत. सर्वजण सुशिक्षित आहेत, मोठमोठी स्टेडियम आहेत, जिथे चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे, तिथे चांगला प्रशिक्षक दिला जातो, म्हणूनच मुले जागतिक विक्रम करत आहेत, असेही पेटकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा