शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

गावांमध्ये क्रीडा अकादमी सुरू होणे पॅरा खेळाडूंसाठी गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:38 IST

भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : आमच्या काळात गावांमध्ये खेळांसाठी उत्कृष्ट सुविधा नव्हत्या आणि आताही पॅरा खेळाडूंसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच शहरांबरोबरच ग्रामीण भागातही क्रीडा अकादमी सुरू होणे गरजेचे आहे, असे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.

जर्मनीत १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर ५२ वर्षांनंतर पेटकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तीन विश्वविक्रमांची नोंद केली. या कामगिरीसह ते पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे भारताचे पहिले खेळाडू ठरले होते.

महाराष्ट्रात १९४४ मध्ये जन्मलेल्या पेटकर यांनी सांगितले, हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. पण गावांमध्ये आताही शहरांप्रमाणे खेळांसाठी गरजेच्या सुविधा मिळत नाहीत. त्यात पॅरा खेळाडूंचा विशेष उल्लेख करावा लागेल. माझ्या काळात गावांमध्ये सुविधा नव्हत्या. आताही ज्या क्रीडा अकादमी बांधल्या जात आहेत त्या शहरांमध्ये बांधल्या जात आहेत. गावांमध्येही अकादमी बांधा. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की अशा उत्कृष्ट सुविधा गावांमध्येही असायला हव्यात.

...म्हणून खेळाडूंकडून जागतिक विक्रम

पूर्वी, जर प्रशिक्षक चांगला असेल तर खेळाडू चांगला नसायचा. जर खेळाडू चांगला असेल तर प्रशिक्षक चांगला नव्हता. पण आता प्रशिक्षक आणि खेळाडू दोघेही चांगले आहेत. सर्वजण सुशिक्षित आहेत, मोठमोठी स्टेडियम आहेत, जिथे चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे, तिथे चांगला प्रशिक्षक दिला जातो, म्हणूनच मुले जागतिक विक्रम करत आहेत, असेही पेटकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा