शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 11:26 IST

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियान

पुणे : संकल्पासमोर विकल्प नसेल तर संकल्प नक्की सिद्धीस जातो. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रनिर्माणासाठी संघर्ष केला. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विखारी वृत्तीने राममंदिराच्या चळवळीची थट्टा केली. आस्थांचा  उपहास केला गेला. अशा वृत्तीला विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. भविष्यात मंदिर उध्वस्त करण्याचे स्वप्नही कोणी पाहू शकणार नाही, अशा शब्दांत साध्वी ऋतुंभराजी यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात, हेही त्यांनी अधोरेखित केले. 

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे साध्वी ऋतुंभराजी यांची जाहीर सभा पार पडली.' सियावर रामचंद्र की जय, 'पवनसुत हनुमान की जय' 'जय श्रीराम' अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माण श्रद्धानिधी अभियानानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे,रवींद्र वंजारवाडकर, ह.भ.प. शिवाजी मोरे, पांडुरंग राऊत, संजय मुद्राळे, तुषार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अभियानप्रमुख तुषार कुलकर्णी यांनी राममंदिराच्या ऐतिहासिक लढ्यावर प्रकाश टाकला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'राम मंदिर निर्माणाची चळवळ ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर उभे राहत आहे.'

साध्वी ऋतुंभराजी यांनी 'भारत माता की जय, अखंड भारत की जय' च्या घोषणेने सुरुवात केली.त्या म्हणाल्या, 'कोणत्याही गोष्टीत सातत्य खूप महत्वाचे असते. आपल्या पूर्वजांनी प्राणांच्या वातीने संघर्षाचा दिवा अखंड तेवत ठेवला. आपण राजनैतिक गुलामी सहन केली, मात्र मनातील आशावाद संपू दिला नाही, शत्रूचे तळवे चाटले नाहीत. पूर्वजांचे शौर्य आणि धैर्यामुळे आपल्याला हे यश पहायला मिळाले आहे. आताच्या शिक्षणातून आपल्या मुलांना स्वाभिमान शिकता येईल का, असा प्रश्न आहे. मुलांना आंतरिक शक्ती देण्याचे काम पालकांचे आहे. मुलांवर स्वाभिमानाचे, राष्ट्रनिर्माणाचे संस्कार मातृशक्तीने केले पाहिजेत.'

-----देश निश्चित सीमांमध्ये बांधलेला आहे. देश राजशक्तीने चालतो, मात्र राष्ट्र आस्थेच्या प्रवाहाने चालते. हिंदूंच्या आस्थेची कायम खिल्ली उडवली गेली. वेब सिरीजमधून आस्थांचा उपहास केला जातो. चित्रपट, मालिकांमधून आपला निश्चय मोडण्याचा प्रयत्न केला जातो, थट्टा केली जाते. मात्र, आपला निश्चय इतका तकलादू नाही. सत्य सुर्यासारखे प्रकाशमान असते. ते कोणीच झाकू शकत नाही.  मध्ययुगातील वाईट काळ परत येणार नाही, याची व्यवस्था आपण करायला हवी.

टॅग्स :PuneपुणेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या