शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'ग्लॅमर, पैशासाठी नव्हे; अभिनयावर प्रेम असेल तरच चित्रपटात या !'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 06:49 IST

चित्रपट क्षेत्रात अनेक मुली ग्लॅमर, पैसा आणि विविध देशांमध्ये प्रवेश करायला मिळेल यासाठी येतात;

पुणे : चित्रपट क्षेत्रात अनेक मुली ग्लॅमर, पैसा आणि विविध देशांमध्ये प्रवेश करायला मिळेल यासाठी येतात; पण अभिनय आणि कलेवरच्या प्रेमापोटी इथे आलात तर काही तरी करण्याची संधी मिळेल, अशा शब्दातं ‘खंडाळा गर्ल’ अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये ‘एंट्री’ करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना कानमंत्र दिला. बॉलिवूड हे पुरुषी वर्चस्वाचे क्षेत्र मानले जात असले, तरी मी सर्वांवर डोमिनेट करते, अशी मिस्कील टिप्पणी तिने केली.काही वर्षांपूर्वी राणी मुखर्जी ‘अय्या’ चित्रपटासाठी पुण्यात शूटिंगकरिता आली होती आणि पक्की पुणेकर बनली. इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकमतर्फे आयोजित ‘वुमन समीट’ सोहळ्यानिमित्त तिचा मुंबई-पुणे-मुंबई प्रवास घडला. या वेळी ऋचा अनिरुद्ध आणि लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी तिच्याशी साधलेल्या संवादातून एक अभिनेत्री, आई अशा ‘स्त्रीत्वाच्या’ तिच्या भूमिकांचा पट उलगडला.शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांकडे पाहण्याची दृष्टी यावर भाष्य करणारा ‘हिचकी’ हा देशभरातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे, हा मातृत्वानंतरचा तिचा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाचा अनुभव तिने मांडला. हा माझ्यासाठी खूप खास असाच चित्रपट होता. एकदा पोहायचे कसे हे माहीत असले, की चार वर्षांनंतरही पोहता येतेच. चित्रपटापासून दूर होते; पण अभिनय करणे विसरले नाही. मला आठवतंय, ‘हिचकी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना पहिल्या दिवशी कारमध्ये बसून खूपच रडत होते. कारण माझ्या १४ महिन्यांच्या मुलीला घरी सोडून बाहेर पडले होते. मातृत्वामध्ये शरीरात अनेक हार्मोनल बदल झालेले असतात. वास्तवातील भूमिका आणि प्राधान्यक्रम बदलेले असतात. महिलांना कुटुंब आणि काम यांचा समतोल सांभाळा लागतो. त्यामुळे थोडी स्थिरस्थावर झाल्यानंतर शूटिंग करणे सोपे झाले. तो काळ खूप कठीण होता. मात्र, कुटुंबाकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला. प्रेक्षकांनी माझे मातृत्व आणि वेगळा विषय म्हणून चित्रपटाला उचलून धरले. चीनमधील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. चायनिज लोक चित्रपट पाहून रडत असल्याचा अनुभव घेतला. चित्रपटाला भाषा आणि प्रांत यांची बंधने नसतात. हे यातून पाहायला मिळाले.’’चित्रपट क्षेत्रात २५ वर्षे काम केले. इतक्या वर्षांचा अनुभवातून हा प्रवास अधिकच प्रगल्भ बनत गेला. प्रत्येक दिवस नवे काहीतरी शिकवणारा असतो. आपण शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. चित्रपटसृष्टीत हे महत्त्वाचे असते. प्रत्येक भूमिका स्वत:मध्ये बदल घडवत असते; त्यामुळे व्यक्तिमत्त्वही बदलते. आज वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर असले तरी २१ वर्षांचीच असल्यासारखीच विचार करते. प्रेक्षकांना काय वेगळ पाहायला आवडेल तेच भूमिकेमधून उभे करण्याचा प्रयत्न करते.... मला अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती. या क्षेत्रात अपघातानेच आले. मी या क्षेत्रात यावे, असे आईला वाटत होते. कोणतीही संधी एकदाच आपल्या दारात येते.ती ओळखायला शिकले पाहिजे. मी तिचे ऐकले आणि इथपर्यंत पोहोचले. हे मिळवायचेच आहे, अशी इच्छा नव्हती. त्यामुळे प्रवासातील प्रत्येक टप्पा मी एन्जॉय केला... हा तिचा प्रवास ऐकताना महिला भारावून गेल्या होत्या. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. कोणताही सामाजिक संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये दिला तर तो प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचतो, याकडेही तिने लक्ष वेधले.>अभिनयच पुढे सुरू ठेवणार... अभिनय हेच माझे पहिले प्रेम आहे. दिग्दर्शन किंवा निर्मिती हे नवºयासाठी ठेवले आहे. यापुढील काळात अभिनयच सुरू ठेवणार असल्याची प्रांजळ कबुली राणी मुखर्जीने दिली.

टॅग्स :Metoo CampaignमीटूRani Mukherjeeराणी मुखर्जीVijay Dardaविजय दर्डा