शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भामा आसखेड धरणात फक्त २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:00 IST

धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे....

आसखेड (पुणे) : गेल्या पंचवीस दिवसांपासून भामा आसखेड धरणातून दररोज एक हजार क्युसेकने पाणी सोडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली असून, भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईस सामोरे जावे लागेल अशी भीती धरण परिसरातील शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत. तर धरणाच्या पश्चिम पट्ट्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्याने आजच दुष्काळसदृश परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.

साधारणपणे धरणात दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असतो असा अंदाज धरण परिसरातील नागरिकांना असतो. पण यावर्षी धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील गावांतील नागरिकांचा अंदाज चुकल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी सुमारे ५० टक्के पाणीसाठा या दरम्यान भामा आसखेड धरणात होता त्यामुळे सुमारे २५ ते ३० किलोमीटरपर्यंत भागात धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नदीपात्रालगतच्या गावातून फुगवाट्याचे पाणी होते. परंतु यंदा पाणी विसर्ग सातत्याने झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली. बाधित शेतकरीच अडचणीत आले तर काही धरणालगतच्या धरण बाधित गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.

खेड तालुक्यातील भामा आसखेड हे ८.१४ टीएमसीचे मातीचे धरण आहे. परंतु त्याचा फायदा खेडपेक्षा शिरूर आणि दौंड तालुक्यालाच जास्त होतो. धरणग्रस्त, बाधित शेतकरी जमिनी देऊन, बेघर होऊनही पाण्याच्या सुविधांपासून कायम वंचितच राहिले आहेत आणि ‘त्या’ शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे शासन दरबारी अद्यापही प्रलंबित असून या समस्यांवर लवकर तोडगा निघावा असे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

भामा आसखेड धरण हे चाकण औद्योगिक वसाहत, पुणे, पिंपरी चिंचवड, आळंदी या शहरांसाठी महत्त्वाचे आहे. परंतु खेड तालुक्यातील चाकण शहर आणि औद्योगिक वसाहतीला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पाणी पुरेल का ? असे चिंतेचे वातावरण नागरिकांत आहे. कारण सध्या धरणात फक्त २९ टक्के पाणीसाठा आहे.

भामा आसखेड धरणात सध्या एकूण साठा ७६.८६० दलघमी (२.७० टीएमसी), उपयुक्त साठा ६३.३४ दलघमी (२.२३ टीएमसी) इतका साठा आहे. परंतु दि. २१ मार्चपासून आजतागायत (सुमारे २५ दिवस) १००० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर धरणात फक्त २९.१७ टक्के पाणीसाठा आहे.

पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना मे महिन्याच्या मध्यस्तीस भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या भागातील कोळीये, गडद, गाबरवाडी, आंभु, वांद्रा, वेल्हावळे आदी गावात नदीपात्र कोरडे पडले आहेत. तसेच काही गावांत पिण्यासाठी अल्पसे पाणी असून वापरासाठी पाणी शिल्लक नसल्याने त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.

टॅग्स :DamधरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड