शहरं
Join us  
Trending Stories
1
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
2
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
3
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
4
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
5
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
6
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
7
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
8
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
9
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
10
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
11
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
12
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
13
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
14
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
15
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
16
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
17
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
18
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल

‘एक भाषा, एक धर्म’ अराजक निर्माण करेल - फादर दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 3:17 AM

साहित्य परिषदेतर्फे सत्कार; सीमेवरील शत्रूपेक्षा घरातील शत्रूंची चिंता जास्त

पुणे : ‘ज्या देशात लोक एकमेकांचा द्वेष करतात, त्या देशाला भवितव्य नसते. सीमेवरील शत्रूपेक्षा मला घरातील शत्रूंची जास्त चिंता वाटते. मते न पटणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मात्र, विरोधाच्या नावाखाली होणारी झुंडशाही आपल्याला मान्य आहे का,’ असा सवाल उपस्थित करत ‘हुकूमशहाचा उदय होतो, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येतात. एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल,’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी खडे बोल सुनावले.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फादर दिब्रिटो यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. या वेळी कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे उपस्थित होते. पं. वसंतराव गाडगीळ यांनी दिब्रिटो यांना संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या. दिब्रिटो यांच्या निवडीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मसाप परिसरात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. माधवराव पटवर्धन सभागृहात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाची तपासणी केली जात होती. दिब्रिटो म्हणाले, ‘आपण एकमेकांचे धर्म साहित्य वाचत नाही, केवळ दोष दाखवतो. धर्मात परिवर्तन घडत आहे, मानवता रुजत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मिशनरी म्हणजे धर्मांतर असा गैरसमज पसरवला जात आहे. सक्तीने धर्मांतराला चर्चचा विरोधच आहे. संविधानाच्या चौकटीत राहून हवा तो धर्म स्वीकारण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणताही धर्म नाही तर भारत टिकला पाहिजे. माणूस हा चिंतनाचा विषय करू या.’देशाची संस्कृती बहुमुखी आहे. विरोध करणारे संस्कृतीची चेष्टा करत आहेत. ज्याला वर्तमानाचे यथार्थ आकलन होते, तोच भूमिका घेऊ शकतो. धर्माने आणि धर्मसंस्थांनी मानवतेला कायम तुरुंगात डांबले. धर्म जितकी माणसे मारतो तितकी आजवर कोणीही मारलेली नाहीत. - डॉ. रावसाहेब कसबे