शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

सुरक्षा दलातील अधिकारी हक्काच्या घरापासून तब्बल १३ वर्षांपासून वंचित, तत्काळ भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 09:25 IST

Pune News: पुण्यातील एका विकासकाने सुरक्षा दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनाच तब्बल १३ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : घराचा ताबा मिळविण्यासाठी विकासकाच्या दारावर हेलपाटे मारणारे सर्वसामान्य ग्राहक आपल्याला पावला पावलावर सापडतील. पण पुण्यातील एका विकासकाने सुरक्षा दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनाच तब्बल १३ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाने याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ भरपाई देण्याचे आदेश विकासकाला दिले आहेत.विंग कमांडर विवेक भारंबे, ग्रुप कॅप्टन व्ही.ए. चौधरी, लेफ्टनंट कमांडर जे.एस. बाल हे निवृत्त अधिकारी, हवाई दलाच्या सेवेत असलेल्या कॅप्टन अनुपमा महाजन, तसेच डॉ. विजय सूद आणि डॉ. रूपेश बेरी यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भूखंड विकसित करण्यासाठी दिला. पुणेस्थित डिफेन्स सिटी डेव्हलपर या कंपनीने ते कंत्राट स्वीकारले. त्यांना जवळपास ८० टक्के रक्कम अदा केली. परंतु, १३ वर्षे उलटल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झाले नाही. पाठपुरावा करूनही भूखंड विकसित केले जात नाहीत आणि ताबाही मिळत नसल्याने संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाकडे धाव घेतली.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष. डी. आर. शिरासो, डॉ. एस. के. काकडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदारांच्या वतीने ॲड. स्मिता सोलवट यांनी बाजू मांडली. वकिलांचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विकासक कंपनी दोषी असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला. तक्रारदारांनी दिलेली एकूण रक्कम आणि त्या रकमेवर १२ टक्के व्याज, तसेच भरपाई म्हणून एक लाख रुपये आणि अर्धवट खर्चाच्या रूपात २५ हजार रुपये तत्काळ देण्याचे आदेश आयोगाने विकासकाला दिले. ही रक्कम आदेश पारित झाल्यापासून एका महिन्याच्या आत परत करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास संपूर्ण रकमेवर १२ टक्के अधिक व्याज द्यावे लागणार आहे. शिवाय तक्रारदारांना जमीन ताब्यात द्यावी, असेही निकालात नमूद केले आहे. 

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांची गेल्या १३ वर्षांपासून अडवणूक सुरू होती. पाच तक्रारींची सुनावणी एकावेळी घेण्यात आली. आयोगाने सर्व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. निकाल येईपर्यंत १४ महिन्याचा कालावधी लागला. एकूण रक्कम व्याजासहित परत करण्यासह जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.- ॲड. स्मिता सोलवट, तक्रारदारांच्या वकील

टॅग्स :HomeघरPuneपुणे