शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वापरलेल्या तेलाच्या नोंदी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 02:11 IST

एफएसएसएआयचा निर्णय : वारंवार तेल तळण्यासाठी वापरण्यास मनाई

पुणे : विविध खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे तेल शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पुढील काळात खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या उत्पादकांना तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाच्या नोंदी ठेवावा लागणार आहेत. परिणामी, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

काही वर्षांपासून भारतीय खाद्य संस्कृतीत खूप बदल झाले आहेत. त्यातच फास्टफूडचा जमाना आल्यामुळे तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना तळलेले, चमचमीत पदार्थ आवडतात. तसेच, बदलत्या संस्कृतीमुळे तळलेले पदार्थ खाणाºयांची संख्या मोठी आहे. बंद पाकिटातील विविध प्रकारच्या वेफर्सपासून ते आॅर्डर करून घरपोच मागविल्या जाणाºया सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता तपासली जात नाही. घरातही तळल्या जाणाºया विविध पदार्थांसाठीसुद्धा वारंवार वापरलेले तेल उपयोगात आणले जाते. मात्र, हे तेल शरीरासाठी हानिकारक आल्याबाबतची अनेकांना जाणीव नसते. तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यास त्यात रासायनिक बदल होतात. या तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे दररोज ५० लिटरपेक्षा जास्त खाद्य तेलाचा वापर करणाºया उत्पादकांना कोणत्या कंपनीचे तेल वापरले जाते, याची नोंद ठेवावी लागेल. तसेच, तेलातील पोलर घटक तपासावा लागेल. त्याचप्रमाणे किती लिटर तेल वापरले जाते व किती कालावधीनंतर पुन्हा ते उपयोगात आणले जात नाही, याची नोंद एफएसएसएआयच्या परिपत्रकानुसार बंधनकाकर असेल.दररोज तीनशे टन खाद्यतेलाची होते शहरात विक्रीशहरामध्ये सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची दररोज प्रत्येकी १०० टनांची विक्री होते. तर, पामतेल ७० ते ८० टन आणि सरकी तेलाची ३० ते ४० टन विक्री होती. घरगुती आणि व्यवसायासाठी सोयाबीन व सूर्यफूल या तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याखालोखाल पाम तेलाला हातगाडीवरील विक्रेत्यांकडून अधिक मागणी असते. तर, फरसाण विक्रेते सरकी तेलाचा अधिक वापर करतात. घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्याचा भाव १,२७० ते १,३२५, तर सूर्यफुलाच्या १५ लिटर डब्याचा भाव १,२५० ते १,३५० रुपये इतका आहे. पामतेलाच्या १५ किलो डब्याचा भाव १,०५० ते १,१५० आणि सरकी तेलाच्या डब्याचा भाव १,१५० ते १,३२० इतका आहे.च्एफडीएच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार वापरल्या जाणाºया तेलातील ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. चांगले कॉलेस्टरॉल कमी होऊ न अपायकारक कॉलेस्टरॉलमध्ये वाढ होते.च्इन्शुलिनमध्ये घट होते आणि लठ्ठपणाही वाढतो. त्यातून हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. त्यामुळेवारंवार तळलेले तेल वापरात आणू नये, याबाबत खबदारीघेतली जात आहे.खाद्यतेलाचा एक उत्कलन बिंदू (बॉयलिंग पॉर्इंट) असतो. त्यापुढे सतत तेल तापत राहिल्यास अथवा एकदा तापवून थंड झालेले तेल पुन्हा तापविल्यास त्यात रासायनिक बदल होतात. असे तेल सेवनात आल्यास शरीरात ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. ट्रान्सफॅट शरीरासाठी अत्यंत घातक असते. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका संभवतो. घरातदेखील एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नये. जर, उरलेल्या तेलाची फोडणी करून ठेवावी. अशा फोडणीचा योग्य त्या पदार्थांमध्ये करावा.- कस्तुरी पाध्ये, आहारतज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे