शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

वापरलेल्या तेलाच्या नोंदी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 02:11 IST

एफएसएसएआयचा निर्णय : वारंवार तेल तळण्यासाठी वापरण्यास मनाई

पुणे : विविध खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे तेल शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पुढील काळात खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या उत्पादकांना तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाच्या नोंदी ठेवावा लागणार आहेत. परिणामी, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

काही वर्षांपासून भारतीय खाद्य संस्कृतीत खूप बदल झाले आहेत. त्यातच फास्टफूडचा जमाना आल्यामुळे तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना तळलेले, चमचमीत पदार्थ आवडतात. तसेच, बदलत्या संस्कृतीमुळे तळलेले पदार्थ खाणाºयांची संख्या मोठी आहे. बंद पाकिटातील विविध प्रकारच्या वेफर्सपासून ते आॅर्डर करून घरपोच मागविल्या जाणाºया सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता तपासली जात नाही. घरातही तळल्या जाणाºया विविध पदार्थांसाठीसुद्धा वारंवार वापरलेले तेल उपयोगात आणले जाते. मात्र, हे तेल शरीरासाठी हानिकारक आल्याबाबतची अनेकांना जाणीव नसते. तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यास त्यात रासायनिक बदल होतात. या तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे दररोज ५० लिटरपेक्षा जास्त खाद्य तेलाचा वापर करणाºया उत्पादकांना कोणत्या कंपनीचे तेल वापरले जाते, याची नोंद ठेवावी लागेल. तसेच, तेलातील पोलर घटक तपासावा लागेल. त्याचप्रमाणे किती लिटर तेल वापरले जाते व किती कालावधीनंतर पुन्हा ते उपयोगात आणले जात नाही, याची नोंद एफएसएसएआयच्या परिपत्रकानुसार बंधनकाकर असेल.दररोज तीनशे टन खाद्यतेलाची होते शहरात विक्रीशहरामध्ये सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची दररोज प्रत्येकी १०० टनांची विक्री होते. तर, पामतेल ७० ते ८० टन आणि सरकी तेलाची ३० ते ४० टन विक्री होती. घरगुती आणि व्यवसायासाठी सोयाबीन व सूर्यफूल या तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याखालोखाल पाम तेलाला हातगाडीवरील विक्रेत्यांकडून अधिक मागणी असते. तर, फरसाण विक्रेते सरकी तेलाचा अधिक वापर करतात. घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्याचा भाव १,२७० ते १,३२५, तर सूर्यफुलाच्या १५ लिटर डब्याचा भाव १,२५० ते १,३५० रुपये इतका आहे. पामतेलाच्या १५ किलो डब्याचा भाव १,०५० ते १,१५० आणि सरकी तेलाच्या डब्याचा भाव १,१५० ते १,३२० इतका आहे.च्एफडीएच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार वापरल्या जाणाºया तेलातील ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. चांगले कॉलेस्टरॉल कमी होऊ न अपायकारक कॉलेस्टरॉलमध्ये वाढ होते.च्इन्शुलिनमध्ये घट होते आणि लठ्ठपणाही वाढतो. त्यातून हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. त्यामुळेवारंवार तळलेले तेल वापरात आणू नये, याबाबत खबदारीघेतली जात आहे.खाद्यतेलाचा एक उत्कलन बिंदू (बॉयलिंग पॉर्इंट) असतो. त्यापुढे सतत तेल तापत राहिल्यास अथवा एकदा तापवून थंड झालेले तेल पुन्हा तापविल्यास त्यात रासायनिक बदल होतात. असे तेल सेवनात आल्यास शरीरात ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. ट्रान्सफॅट शरीरासाठी अत्यंत घातक असते. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका संभवतो. घरातदेखील एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नये. जर, उरलेल्या तेलाची फोडणी करून ठेवावी. अशा फोडणीचा योग्य त्या पदार्थांमध्ये करावा.- कस्तुरी पाध्ये, आहारतज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे