शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

वापरलेल्या तेलाच्या नोंदी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 02:11 IST

एफएसएसएआयचा निर्णय : वारंवार तेल तळण्यासाठी वापरण्यास मनाई

पुणे : विविध खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे तेल शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पुढील काळात खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या उत्पादकांना तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाच्या नोंदी ठेवावा लागणार आहेत. परिणामी, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

काही वर्षांपासून भारतीय खाद्य संस्कृतीत खूप बदल झाले आहेत. त्यातच फास्टफूडचा जमाना आल्यामुळे तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना तळलेले, चमचमीत पदार्थ आवडतात. तसेच, बदलत्या संस्कृतीमुळे तळलेले पदार्थ खाणाºयांची संख्या मोठी आहे. बंद पाकिटातील विविध प्रकारच्या वेफर्सपासून ते आॅर्डर करून घरपोच मागविल्या जाणाºया सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता तपासली जात नाही. घरातही तळल्या जाणाºया विविध पदार्थांसाठीसुद्धा वारंवार वापरलेले तेल उपयोगात आणले जाते. मात्र, हे तेल शरीरासाठी हानिकारक आल्याबाबतची अनेकांना जाणीव नसते. तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यास त्यात रासायनिक बदल होतात. या तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे दररोज ५० लिटरपेक्षा जास्त खाद्य तेलाचा वापर करणाºया उत्पादकांना कोणत्या कंपनीचे तेल वापरले जाते, याची नोंद ठेवावी लागेल. तसेच, तेलातील पोलर घटक तपासावा लागेल. त्याचप्रमाणे किती लिटर तेल वापरले जाते व किती कालावधीनंतर पुन्हा ते उपयोगात आणले जात नाही, याची नोंद एफएसएसएआयच्या परिपत्रकानुसार बंधनकाकर असेल.दररोज तीनशे टन खाद्यतेलाची होते शहरात विक्रीशहरामध्ये सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची दररोज प्रत्येकी १०० टनांची विक्री होते. तर, पामतेल ७० ते ८० टन आणि सरकी तेलाची ३० ते ४० टन विक्री होती. घरगुती आणि व्यवसायासाठी सोयाबीन व सूर्यफूल या तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याखालोखाल पाम तेलाला हातगाडीवरील विक्रेत्यांकडून अधिक मागणी असते. तर, फरसाण विक्रेते सरकी तेलाचा अधिक वापर करतात. घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्याचा भाव १,२७० ते १,३२५, तर सूर्यफुलाच्या १५ लिटर डब्याचा भाव १,२५० ते १,३५० रुपये इतका आहे. पामतेलाच्या १५ किलो डब्याचा भाव १,०५० ते १,१५० आणि सरकी तेलाच्या डब्याचा भाव १,१५० ते १,३२० इतका आहे.च्एफडीएच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार वापरल्या जाणाºया तेलातील ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. चांगले कॉलेस्टरॉल कमी होऊ न अपायकारक कॉलेस्टरॉलमध्ये वाढ होते.च्इन्शुलिनमध्ये घट होते आणि लठ्ठपणाही वाढतो. त्यातून हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. त्यामुळेवारंवार तळलेले तेल वापरात आणू नये, याबाबत खबदारीघेतली जात आहे.खाद्यतेलाचा एक उत्कलन बिंदू (बॉयलिंग पॉर्इंट) असतो. त्यापुढे सतत तेल तापत राहिल्यास अथवा एकदा तापवून थंड झालेले तेल पुन्हा तापविल्यास त्यात रासायनिक बदल होतात. असे तेल सेवनात आल्यास शरीरात ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. ट्रान्सफॅट शरीरासाठी अत्यंत घातक असते. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका संभवतो. घरातदेखील एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नये. जर, उरलेल्या तेलाची फोडणी करून ठेवावी. अशा फोडणीचा योग्य त्या पदार्थांमध्ये करावा.- कस्तुरी पाध्ये, आहारतज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे