शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:05 IST

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे.

सुपे (बारामती) : मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असुन शासनाला कायदा पारीत केल्याशिवाय पर्याय राहिला नाही असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास जरांगे पाटील यांनी पुष्पहार घालुन मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. त्यामुळे वरवंड येथील सभा आटोपुन सुप्यामार्गे मोरगाव, जेजुरी कडे जात असताना सुप्यात सकळ मराठा क्रांती मोर्चा सुपे परगना यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील यांचे स्वागत सकळ मराठा समाजच्यावतीने करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की अ. नगर मध्ये साडेतीन लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे २४ डिसेंबरचा दिवस उजाडेपर्यत आपल्याला आरक्षण सरकारला द्याव लागणार आहे. मात्र राजकारण, मतभेद आणि आंदोलने शांततेत करा आणि कोणीही आत्महत्या करु नका आरक्षण आपल्याला मिळणार आहे. 

आत्तापर्यंत अनेक पक्षातील साहेब मोठे केले आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यत एकच पक्ष राहु द्या. ते म्हणजे स्वत:चे नशिब आणि आरक्षण. माझ्या जिवात जिव असेपर्यंत मी तुम्हाला आरक्षण मिळवु देणार आहे. आरक्षणाची सद्या ७० टक्के लढाई जिंकली असुन अद्याप ३० टक्के लढाई शिल्लक आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबर पासुन आंदोलणाची दिशा बदलुन प्रत्येक खेड्यापाड्यात गावोगावी मराठा समाजाने साखळी उपोषण शांततेत करावे. अगदी एक घर असले तरी त्याने स्वत:च्या गोठ्यात साखळी उपोषण करुन मराठा आरक्षणाची ताकद सरकारला दाखवुन द्यायची आहे. तसेच मऱाठा समाजाने व्यसनापासुन लांब राहण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.               

टॅग्स :BaramatiबारामतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण