शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:22 IST

भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही.

पुणे - भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. अद्यापही देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश असे आहेत, की ज्यात अवयवदानविषयक जनजागृती नाही. दरवेळी शासनाला दोष देण्यापेक्षा आपण स्वत:हून आवश्यक ते बदल आत्मसात करण्याविषयी जागरुकता दाखविली पाहिजे.

खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवयवदानविषयक मोठ्या प्रमाणात सजगता पाहावयास मिळते. देशातील एकूण अवयवदानाच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात विरोधाभास असल्याचे दिसते. ‘प्रचार अवयवदानाचा’ या माध्यमातून लोकमानस घडवून त्याचे परिवर्तन अवयवदानात कसे करता येईल, याचा विचार करण्याचे काम फाउंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत. पुण्यात मागील तीन वर्षांपासून २०० जणांकडून अवयवदान झाले. या आकडेवारीवरून नजर फिरवल्यास आपल्याला अवयवदान व जनजागृती याची कल्पना येईल. मंगळूर येथे नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन, मंगळूर आणि असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यात अनुक्रमे ७५, ५३ आणि १०५ किमी अंतर सायकलिंग करण्यात आली.या सर्वांमागील उद्देश हाच, की अवयवदानचा प्रचार आणि प्रसार. अवयवदानाविषयी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अभ्यास केला असता त्यात रत्नागिरी, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये एकही परवानाधारक अवयवदानाचे रुग्णालय नाही. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रबांधणीच्या मोठ्या गप्पा आपण करीत असलो तरीदेखील प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे मोठी अवघड गोष्ट आहे. याकरिता गरज आहे ती जनमानसाचे वैचारिक प्रबोधन करण्याची. याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातही अवयवदानाचा परवाना नाही. या तुलनेत नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अवयवदानाची जागृती झालेली दिसते. आता सोलापूर, कोल्हापूरमध्ये अवयवदान होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध असताना दुसºया बाजूला अद्यापही अवयवदानाविषयी फारशी माहिती नसल्याचे चित्र दिसून येते. या वास्तवाचा स्वीकार करून आगामी काळात भरीव कामगिरी कशी करता येईल, याचा विचार सर्वांना करावा लागेल. यासाठी केवळ अवयवदानाशी संबंधित संस्था किंवा संघटनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्थेला महाराष्ट्र आरोग्य विभागाने आपला हेल्पलाईन क्रमांक दिला. त्या माध्यमातून संस्थेचा उत्साह वाढून अवयवदानाविषयी काम करण्याचे मनोबल वाढण्यास मदत झाली. सोशल माध्यमांचा उपयोग याकामी करता येऊ लागला. यूट्यूबवर अवयवदानाविषयीची माहिती अपलोड करून सबंध जगभरात पोहोचता येत आहे. अवयवदान ही चळवळ व्हावी याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न झाल्यास त्याचा उपयोग सर्वांनाच होईल. अवयवदानाबाबत जगातील इतर प्रगत देशांची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला आणखीमोठी मजल मारायची आहे, याची कल्पना येईल.तीन वर्षांपूर्वी अवयवदानाविषयी पाच मिनिटांचा माहितीपट तयार केला होता. त्या निर्मितीप्रक्रियेदरम्यान आपल्याकडे अद्यापही अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणावर कामाची गरज असल्याचे निदर्शनास आले. रिबर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आता अवयवदान करण्यासाठी प्रचार-प्रसाराकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून नुकतीच त्याची सुरुवात कर्नाटकातील मंगळूर येथून करण्यात आली. सायकल रॅलीतून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. याविषयी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांच्याशी साधलेला संवाद.राजेश शेट्टी : देशातील पाच राज्ये आणि कें द्रशासित प्रदेशांत अवयवदान नाही

टॅग्स :PuneपुणेOrgan donationअवयव दान