शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एरोस्पेस डिफेन्स हबसाठी पुण्यात पोषक वातावरण, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:23 IST

संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आहे. पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे.

संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आहे. पुण्याचा विस्तार वेगाने होत आहे. औद्योगिक हब झालेल्या पुण्यात देशांतर्गत विमानांची देखभाल-दुरुस्ती तसेच विकासाकरिता स्वतंत्र एरोस्पेस आणि डिफेन्स हबची (एम.आर.ओ.) निर्मिती होणे गरजेचे आहे. सध्या कोइमतूर येथे या प्रकराच्या हबची निर्मिती होत आहे. पुण्यात अशा हबची निर्मिती झाल्यास लष्करी आणि नागरी उड्डाण क्षेत्राला व सरंक्षणक्षेत्रालाही त्यांचा फायदा होईल.लहानपणापासून मी पुण्याला बदलताना पाहिले आहे. हवाईदलात भरती झाल्यावर सुरुवातीला १९६८मध्ये लोहगाव विमानतळावरून वॅमपायर, तर निवृत्त होण्याआधी सुखोई विमाने चालवली आहेत. त्या वेळचे आकाशातून दिसणारे पुण्याचे दृश्य आणि आणि आत्ताचे दृश्य यांत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. पुण्यात सरंक्षणक्षेत्रातील संस्थांबरोबरच मानवी वस्ती आणि उद्योगांचाही झपाट्याने विस्तार झाला आहे. पुण्यासाठी स्वतंत्र विमानतळ गरजेचा आहे. या विमानतळाकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता, सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. कारण, लोहगाव विमानतळ सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा फ्रंटलाईन विमानतळ असून तेथून उड्डाण करून हवेतूनच इंधन भरून काही वेळातच शत्रूवर हल्ला करता येऊ शकतो. याचबरोबर, पश्चिमेकडील भारताच्या समुद्रहद्दीतील साधनसपंत्ती आणि किनाऱ्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा विमानतळ महत्त्वाचा आहे. सध्या केवळ गोवा, जामनगर आणि पुणे हे तीनच लष्करी विमानतळ या संपूर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आहेत. त्यामुळे नव्या विमानतळांची गरज आहे. पुण्यात वाढलेले उद्योग तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने प्रवासी आणि उद्योजकांसाठी स्वतंत्र विमानतळाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यामुळे आता तरी पुरंदरचा विमानतळ लवकर व्हावा, अशी अपेक्षा करतो. पाकिस्तान आणि चीन यांच्या धोक्यामुळे पूर्वेकडे विमानतळ उभारले गेले. यामुळे दक्षिण भारतात लष्करीदृष्ट्या विमानतळ उभारले गेले नाहीत. सध्या चीन विविध देशांत त्यांचे तळ उभारत आहे; त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. यामुळे या विमानतळांकडे व्यावसायिक दृष्टीने न बघता, सामरिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. शैक्षणिकदृष्ट्या पुणे आघाडीवर आहे. उद्योगांचा विकास झाल्याने अनेक तज्ज्ञमंडळी पुण्यात आहेत. शिवाय, अनेक लष्करी तळ आणि डीआरडीओसारख्या प्रयोगशाळा पुण्यातच असल्याने एरोस्पेस आणि डिफेन्स हबसाठी लागणारे मनुष्यबळ व आवश्यक सुविधाही मिळू शकतात. या प्रकारचा हब पुण्यात झाला, तर त्याचा मोठा फायदा होईल. तसेच, नागरी क्षेत्रातील विमाननिर्मितीमध्येही आपण स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पुढे जाऊ.पुरंदरला होणारा विमानतळ हा केवळ पुण्यापुरता मर्यादित नसेल. डिफेन्स प्रॉडक्शन, मालाची ने-आण तसेच कृषी उत्पादनांच्या दृष्टीने हा विमानतळ फायद्याचा आहे. आज पुण्याची ओळख ही केवळ शिक्षण आणि सांस्कृतिक एवढीच राहिलेली नाही. औद्योगिक हब असलेल्या पुण्यात या प्रकारच्या विमानतळामुळे दळणवळण वेगवान होईल आणि खºया अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पुण्याच्या मानांकनात वाढ होईल.शब्दांकन : निनाद देशमुख

टॅग्स :airforceहवाईदलPuneपुणेnewsबातम्याDefenceसंरक्षण विभाग