शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी साखर कारखान्यांना नोटिसा; साखर आयुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १,५०० कोटी रुपयांची एफआरपी (उसाची रास्त किफायतशीर किंमत) थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी ६३ कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या कारखान्यांनी कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांची थकीत रक्कम व्याजासह द्यावी; अन्यथा त्यांना यंदाच्या हंगामात गाळप करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासंदर्भात दिला आहे.

नोटीस दिलेल्या कारखान्यांमध्ये किसन वीर व साईकृपा या कारखान्यांचा समावेश आहे. साईकृपा खासगी कारखाना असून, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांचा आहे. किसन वीर सहकारी कारखाना आहे. यापूर्वी ५ कारखान्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. एकूण ६३ कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्तांनी पुढील आठवड्यापासून ठेवली असून, त्यांनाही शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्वरित अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शेट्टी यांनी यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची आज भेट घेतली व कारखाना संचालकांकडून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने आम्हाला व्याज नको, असे लिहून घेतले जात असल्याची तक्रार केली.

यंदा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम केला. त्यातील ९० कारखान्यांनी त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. अन्य कारखान्यांमध्ये ७० ते ८० टक्के रक्कम दिली, उर्वरित राहिली, असे कारखाने आहेत. ऊस कारखान्याला दिल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्याला त्याची किंमत एकरकमी दिली जावी, असा कायदा आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी द्यावे, असे सूचित केले. त्याचीच री महाविकास आघाडी सरकारने ओढली. मात्र, आता एफआरपी दोन हप्त्यांत होऊनही शेतकऱ्यांचे पैसे कारखान्यांनी थकवले आहेत.

आयुक्त गायकवाड यांनी सांगितले की, थकीत एफआरपीवरून आतापर्यंत ७ कारखान्यांना नोटीस दिली आहे. ६३ कारखान्यांची सुनावणी घेत आहोत. एफआरपी पूर्ण दिली जात नाही तोपर्यंत गाळपास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे येत्या महिनाभरात किमान १ हजार कोटी रुपये दिले जातील.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने