शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 15:08 IST

खालच्या पातळीवरची टीका करून राजकीय नेते मराठी भाषेच्या दर्जाची अधोगती करत आहेत

पुणे : ‘आपल्या भाषेचा दर्जा राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. मात्र, खालच्या पातळीवरची टीका करून राजकीय नेते भाषेच्या दर्जाची अधोगती करीत आहेत. त्यामुळे ‘काही न बोलणे हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल,’ असे आता आपल्याला राजकारण्यांना सांगावे लागेल, अशा शब्दांत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी शनिवारी राजकारण्यांना खडे बोल सुनावले.'

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अभिजात भाषा जनसन्मान सोहळा’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सरहद संस्थेचे संजय नहार आणि प्रा. दिलीप पंगू यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा आणि साहित्याचे जागतिक स्तरावर काय स्थान आहे, हेही पाहणे गरजेचे आहे, याकडे मोरे यांनी लक्ष वेधले. सध्याच्या कृत्रिम भाषेबद्दलही मराठी माणसाने सजग राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुळे म्हणाले, ‘इतर राज्यांमध्ये मराठी भाषिक आणि संस्था आहेत; परंतु त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष कधीच गेले नाही. निर्मिती क्षमता वाढली तरच मराठीचा विकास होईल. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘मराठीला अभिजित दर्जा मिळण्यात अनेक संस्थांनी योगदान दिले. निवडणुका असो किंवा इतर काही कारण असो अभिजात दर्जा मिळाला हे महत्त्वाचे आहे. आता शासनाकडून अपेक्षा ठेवू नका. तर आपली भाषा जपणे ही समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आपण मराठीसाठी काय करतो याचाही विचार झाला पाहिजे.’ डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची पुस्तकतुला करण्यात आली. धनश्री पाटील यांनी प्रास्ताविक, तर वंदना कोर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेSadanand Moreसदानंद मोरेcultureसांस्कृतिकSocialसामाजिकPoliticsराजकारणmarathiमराठी