शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:00 IST

महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.

पुणे : महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी आणि मुद्राही आहे. मग आपल्या देशाला राष्ट्रभाषा का असू नये? त्यामुळे भारताची संवैैधानिक राष्ट्रभाषा जाहीर व्हावी, हिंदीला राष्ट्रभाषेचा, तसेच प्रांतीय भाषांना राज्यभाषेचा दर्जा द्यावा आणि भारताला इंडिया नव्हे, तर भारत म्हणूनच संबोधावे, अशी मागणी अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांनी केली.राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी ‘भारतीय भाषा अपनाओ अभियान’ अंतर्गत वरिष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांच्या पुढाकारातून मुंबई येथून ही भाषा सन्मान यात्रा मंगळवारी सकाळी ६ वाजता निघाली. दि. ४ जानेवारीपर्यंत ही ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. भारतीय भाषा अपनाओ अभियानांतर्गत ५०० भारतीयांचे शिष्टमंडळ देशभर फिरून राष्ट्रभाषेसाठी जागृती करणार आहे. हे शिष्टमंडळ पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधला.या वेळी राष्ट्रीय भाषा समितीचे एम. एल. गुप्ता, अभियानाचे मुख्य संयोजक व ‘जितो’चे माजी अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी, अभियानाचे समन्वयक डॉ. कल्याण गंगवाल, रमेश ओसवाल, ‘जितो’चे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, पूना मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओस्तवाल, अरुण सिंघवी व अभय सेठिया, जितो व महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्तयांच्यासह इतर मान्यवर उपस्थितहोते.हिंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २०१९ रोजी हे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना निवेदन देणार आहे. भारतीय भाषांचा सन्मान वाढवावा, भारताची राष्ट्रभाषा असावी व भारताला इंडिया नव्हे, तर भारत संबोधावे, या मागण्यांचा समावेश आहे.- डॉ. कल्याण गंगवाल

टॅग्स :IndiaभारतPuneपुणे