शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:19 IST

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता

पुणे : छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरच होते. त्यांना धर्मवीर न म्हणणे हे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनात केल्यानंतर भाजपने राज्यभर निर्दशने सुरू केली. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावला.

ते म्हणाले, “संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणण्यास कोणाचाही विरोध नाही, ते स्वराज्यरक्षक आहेतच. मात्र, ते धर्मवीर नाहीत असे म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. हा त्यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचार का सहन करावे लागले?, औरंगजेबाने काय मागणी केली होती? खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात एकही हिंदू उरला नसता. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच.”

शरद पवार यांना आम्ही जाणता राजाच म्हणू, असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणावे. माझे म्हणणे एवढेच आहे की, या देशात एकच जाणते राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचे असेल ते म्हणावे जनता मात्र म्हणणार नाही.”

सध्या अभिनेत्री ऊर्फी जावेदवरून भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात पडू नये असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. त्यावर याचे आपण स्वागतच करतो. मात्र, त्यांचा हा सल्ला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मानला पाहिजे. सुळे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, पण त्यांच्या सल्ल्याचे पालन व्हायला हवे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार