भटक्या विमुक्तांना हवी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST2021-05-20T04:10:58+5:302021-05-20T04:10:58+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत निवेदन देण्यात आले. ...

भटक्या विमुक्तांना हवी मदत
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आघाडीचे शहराध्यक्ष राजेश धोत्रे बंडू जायभाये, भगतसिंग कल्याणी, शिवपुत्र क्षत्री, शक्तिसिंग कल्याणी, शैलेश काची, भीम देवकाते यावेळी उपस्थित होते. वडार, गोसावी, गारुडी, घिसाडी, कटबू, लोहार, गोंधळी, जोशी, डमरूवाले, कोल्हाटी, मसनजोगी, नंदीवाले, शिखलकर, वासुदेव, भोई, धनगर, वंजारी, बंजारा या समाजघटकांतील लोक भटकंती करूनच उदरनिर्वाह करतात. कोरोनामुळे त्यांच्या भटकंतीवर बंधने आल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांंना सरकारने त्वरित मदत करावी, असे धोत्रे व अन्य कार्यकर्त्यांंनी निवेदनात म्हटले आहे.