शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:23 IST

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही...

पुणे :पुणेरेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकाही रेल्वेच्या इंजिनमध्ये अथवा सेक्शनमध्ये ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टम) ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-मुंबईसहमुंबई-चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या १२०० किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही.

दि. २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांना भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले, तर १ हजार १७५ जखमी झाले. देशातील गेल्या २० वर्षांतील हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात नुकताच घडला. यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली. रेल्वे अतिवेगाने, सिग्नल ओलांडून गेल्याने, तसेच एकाच रुळावर समोरासमोर येऊन हा अपघात घडला. अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांना आळा बसावा म्हणून २०१२ साली रेल्वेत ‘टिकास’विषयी चाचणी झाली. नंतरच्या काळात त्याचे नामकरण ‘कवच’ असे करण्यात आले. २०२२ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बीदर-परळी वैजनाथ-परभणी, मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद-गडवाल-गुंटकल सेक्शनमध्ये कवच बसवण्यात आले, तसेच या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनांमध्येही त्याचे डिव्हाइस बसवण्यात आले आहेत.

असे आहे ‘कवच’...

- लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो.

- ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते.

- कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे.

- लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिटी वाजणे.

फायदा काय..

याचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाइन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन गाड्या आमने-सामने अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो. यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी, दोन किलोमीटर आधीच गाड्या थांबतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी धावणे या कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.

मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात ‘कवच’ यंत्रणा नाही. येत्या काळात मध्य रेल्वेच्या इंजिनला ही यंत्रणा बसवली जाईल.

- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

टॅग्स :railwayरेल्वेbalasore-pcबालासोरIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे