शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:23 IST

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही...

पुणे :पुणेरेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकाही रेल्वेच्या इंजिनमध्ये अथवा सेक्शनमध्ये ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टम) ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-मुंबईसहमुंबई-चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या १२०० किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही.

दि. २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांना भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले, तर १ हजार १७५ जखमी झाले. देशातील गेल्या २० वर्षांतील हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात नुकताच घडला. यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली. रेल्वे अतिवेगाने, सिग्नल ओलांडून गेल्याने, तसेच एकाच रुळावर समोरासमोर येऊन हा अपघात घडला. अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांना आळा बसावा म्हणून २०१२ साली रेल्वेत ‘टिकास’विषयी चाचणी झाली. नंतरच्या काळात त्याचे नामकरण ‘कवच’ असे करण्यात आले. २०२२ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बीदर-परळी वैजनाथ-परभणी, मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद-गडवाल-गुंटकल सेक्शनमध्ये कवच बसवण्यात आले, तसेच या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनांमध्येही त्याचे डिव्हाइस बसवण्यात आले आहेत.

असे आहे ‘कवच’...

- लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो.

- ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते.

- कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे.

- लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिटी वाजणे.

फायदा काय..

याचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाइन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन गाड्या आमने-सामने अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो. यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी, दोन किलोमीटर आधीच गाड्या थांबतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी धावणे या कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.

मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात ‘कवच’ यंत्रणा नाही. येत्या काळात मध्य रेल्वेच्या इंजिनला ही यंत्रणा बसवली जाईल.

- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

टॅग्स :railwayरेल्वेbalasore-pcबालासोरIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे