शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:23 IST

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही...

पुणे :पुणेरेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकाही रेल्वेच्या इंजिनमध्ये अथवा सेक्शनमध्ये ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टम) ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-मुंबईसहमुंबई-चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या १२०० किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही.

दि. २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांना भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले, तर १ हजार १७५ जखमी झाले. देशातील गेल्या २० वर्षांतील हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात नुकताच घडला. यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली. रेल्वे अतिवेगाने, सिग्नल ओलांडून गेल्याने, तसेच एकाच रुळावर समोरासमोर येऊन हा अपघात घडला. अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांना आळा बसावा म्हणून २०१२ साली रेल्वेत ‘टिकास’विषयी चाचणी झाली. नंतरच्या काळात त्याचे नामकरण ‘कवच’ असे करण्यात आले. २०२२ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बीदर-परळी वैजनाथ-परभणी, मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद-गडवाल-गुंटकल सेक्शनमध्ये कवच बसवण्यात आले, तसेच या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनांमध्येही त्याचे डिव्हाइस बसवण्यात आले आहेत.

असे आहे ‘कवच’...

- लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो.

- ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते.

- कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे.

- लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिटी वाजणे.

फायदा काय..

याचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाइन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन गाड्या आमने-सामने अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो. यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी, दोन किलोमीटर आधीच गाड्या थांबतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी धावणे या कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.

मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात ‘कवच’ यंत्रणा नाही. येत्या काळात मध्य रेल्वेच्या इंजिनला ही यंत्रणा बसवली जाईल.

- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

टॅग्स :railwayरेल्वेbalasore-pcबालासोरIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे