शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Kavach Technology: मध्य रेल्वेतील एकाही इंजिनमध्ये नाही सुरक्षा ‘कवच’; कशी काम करते ही यंत्रणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 08:23 IST

देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही...

पुणे :पुणेरेल्वे विभागासह मध्य रेल्वेच्या एकाही रेल्वेच्या इंजिनमध्ये अथवा सेक्शनमध्ये ‘कवच’ (ट्रेन कोलेजन अव्हॉइड सिस्टम) ही यंत्रणा अद्याप बसवण्यात आलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिल्ली-मुंबईसहमुंबई-चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षात ही यंत्रणा बसवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सध्या केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या १२०० किलोमीटर मार्गावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. देशातील १३ हजार २१५ इंजिनांपैकी केवळ ६५ इंजिनांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून, यात मध्य रेल्वेचा समावेश अद्याप झालेला नाही.

दि. २ जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वेस्थानकाजवळ शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी या तीन रेल्वेगाड्यांना भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवासी ठार झाले, तर १ हजार १७५ जखमी झाले. देशातील गेल्या २० वर्षांतील हा सर्वांत मोठा रेल्वे अपघात नुकताच घडला. यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली. रेल्वे अतिवेगाने, सिग्नल ओलांडून गेल्याने, तसेच एकाच रुळावर समोरासमोर येऊन हा अपघात घडला. अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांना आळा बसावा म्हणून २०१२ साली रेल्वेत ‘टिकास’विषयी चाचणी झाली. नंतरच्या काळात त्याचे नामकरण ‘कवच’ असे करण्यात आले. २०२२ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सिकंदराबाद येथे कवच चाचणी केली होती. चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य रेल्वेच्या बीदर-परळी वैजनाथ-परभणी, मनमाड-परभणी-नांदेड, सिकंदराबाद-गडवाल-गुंटकल सेक्शनमध्ये कवच बसवण्यात आले, तसेच या मार्गावरून धावणाऱ्या ६५ इंजिनांमध्येही त्याचे डिव्हाइस बसवण्यात आले आहेत.

असे आहे ‘कवच’...

- लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास स्वयंचलित ब्रेकद्वारे रेल्वेचा वेग नियंत्रित होतो.

- ही यंत्रणा रेल्वेच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते.

- कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या रेल्वेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे.

- लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिटी वाजणे.

फायदा काय..

याचा सर्वाधिक फायदा हा सिंगल लाइन सेक्शनमध्ये होतो. एकाच रुळावर दोन गाड्या आमने-सामने अथवा एका पाठीमागे एक अशा धावत असल्यास त्या एकमेकांना धडकून अपघात होऊ नये, म्हणून या यंत्रणेचा वापर होतो. यामुळे दोन गाड्यांमध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर राखणे शक्य होते. परिणामी, दोन किलोमीटर आधीच गाड्या थांबतात. यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. शिवाय सिग्नल लाल असताना रेल्वे पुढे जाणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी धावणे या कारणांमुळे होणारे अपघात रोखता येतात.

मध्य रेल्वेच्या कोणत्याही विभागात ‘कवच’ यंत्रणा नाही. येत्या काळात मध्य रेल्वेच्या इंजिनला ही यंत्रणा बसवली जाईल.

- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

टॅग्स :railwayरेल्वेbalasore-pcबालासोरIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईPuneपुणे