शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:56 IST

शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली.

ठळक मुद्देआपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे आयुक्तांचे पत्र

पुणे : शहरात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे. पालिकेच्या मुख्य सभेने पर्वती येथील सर्व्हे क्रमांक १३५ येथील फायनल प्लॉट क्र. २८ मधील पुरात बाधित झालेल्या २६ कुटुंबांचे आठ दिवसात जवळच्या परिसरात पुनर्वसन करण्याचा ठराव केला होता. परंतू, आयुक्तांच्या पत्रामुळे पुनर्वसन रखडण्याची चिन्हे आहेत. शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह ओढ्याशेजारील उद्याने, वास्तूंना या पुराचा तडाखा बसला. साधारणपणे २८ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी या पुरात गेला. पर्वतीमधील सर्व्हे क्रमांक १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांचेही पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरात बाधित झालेल्या या २६ कुटुंबांना आठ दिवसात एक किलोमीटरच्या आत उपलब्ध सदनिकांमध्ये पुनर्वसित करण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेच्या गाळा वाटप नियमावलीमध्ये आपतकालीन परिस्थतीमध्ये बाधित झालेल्या कुटूंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच राज्यसरकारची मान्यता मिळेल या भरवश्यावर आठ दिवसात पुर्नवसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने केला होता. यासंदर्भात शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समिती मार्फत आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेला एक पत्र पाठविले आहे. पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब ही प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे त्यांचे पुर्नवसन करता येणार नाही असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधितांच्या आशांवर पाणी फेरले गेल्याची टीका होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूरFamilyपरिवारcommissionerआयुक्त