शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

स्मार्ट सिटीला नाही पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:30 AM

कायदा सुव्यवस्था ऐरणीवर; फिर्यादींना यावे लागते चतु:शृंगीला, अंतर सहा किलोमीटर

- प्रकाश कोकरे पुणे : शासनाने बाणेर-बालेवाडी, औंध, पाषाण परिसराला स्मार्ट सिटी असे घोषित केले असले, तरी या भागात अत्यावश्यक पोलीस ठाणे नाही. जर नागरिकांना फिर्याद द्यायची असेल, तर चतु:शृंगी पोलीस ठाण्याला पाच ते सात किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे स्मार्ट सिटीची कायदा सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. जवळ पोलीस ठाणे नसल्यामुळे गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यासाठी देखील वेळ लागतो.या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. स्मार्ट सिटीचा परिसर हा २५ ते ३० किलोमीटरचा आहे. या मोठ्या भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अत्यंत गरज आहे. स्मार्ट सिटी लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे.सध्या या भागाची लोकसंख्या अंदाजे दीड लाखाच्या घरात आहे. चतु:शृंगी पोलीस चौकीवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.या भागात अनेक आयटी कंपन्या; तसेच बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्यामुळे या गावठाणांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीमधून मोठ्या प्रमाणात या भागात पैसा आल्यामुळे अनेक गुन्हेगारी कृत्ये होत आहेत. पोलिसांची ज्या प्रकारची भीती असावी त्याप्रकारची दिसून येत नाही, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक राहिला नाही. या परिसरासाठी चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काम पाहिले जाते.पोलीस ठाण्याची इमारत प्रतीक्षेतपरंतु, बाणेर-बालेवाडीसाठी कमिन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारात पोलीस चौकी बांधून देण्यात आली आहे. कंपनीने ही वास्तू पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली आहे; परंतु दोन वर्षांपासून ही चौकी चालू करण्यात आली नसून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंदसुद्धा या ठिकाणी करून घेतली जात नाही. त्यामुळे या परिसरामध्ये जबरी चोरी, फसवणूक, सोनसाखळीचोरी, वाहनचोरी, दंगा, घरफोडी अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिसरात संध्याकाळी पोलिसांमार्फत घातल्या जाणाºया गस्तीचे प्रमाण कमी आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, मनुष्यबळ कमी आहे किंवा शासनाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाणेर-बालेवाडीच्या नागरिकांकडे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. चतु:शृंगी पोलीस स्टेशनपासून बाणेर-बालेवाडी हे अंतर जास्त आहे, तसेच अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गुन्हेगार पसार होत आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे पुरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गस्ती पथकांची संख्या तीन आहे. १ बीट मार्शल आहे. परिसरात मदतकेंद्र सुरू केले आहे. स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली नाही. आॅनलाइन गुन्ह्यांच्या नोंदी जरी होत असल्या, तरी प्रत्यक्षात तक्रारदाराला चतु:शृंगी पोलीस ठाण्याला यावे लागते.- दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस