शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अडकवत नाहीये ;विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 20:56 IST

,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.

पुणे : एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला. मात्र,केंद्रात व राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी हा तपास एनआयएकडे का दिला नाही. पाच वर्षे हे काय झोपले होते का? अशा शब्दात बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच ज्यावेळी एसआयटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी महाराष्ट्रातील एका ‘नारदाने’दिल्लीत जाऊन याबाबतची माहिती दिली. त्यामुळे  आम्ही त्या ‘नारदा’चा शोध घेत आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.सारथी संस्थेला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी गुरुवारी (दि. २०) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की कोरेगाव भीमा मधील दंगलीच्या चौकशीला योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून 26/11 ची फेर चौकशी करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र,भाजप नेहमीच अशी सोईची व दुट्टी भूमिका घेत असते. त्याला काही अर्थ नाही.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा मंत्र्यांना ‘क्लिन चिट’ दिली. खरे तर त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे होते. पण,चौकशी करायचीच नाही,अशी भूमिका मागील सरकारने घेतली होती. आमच्या सरकारने आरोप असणा-या माजी मंत्र्यांच्या चौकशीचा निर्णय घेतला असल्याने संबंधितांना चौकशीला सामोरे जावे लागेल.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न कोणीही करत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी सांगितले, की फडणवीस यांच्यासह सर्वांसाठी कायदा समान आहे. कोणाचेही तोंड पाहून कायदा काम करत नाही. मात्र,कायद्यापेक्षा कोणी स्वत:ला मोठे समजत असेल तर तो कायद्याला मानत नाही,असा त्याचा अर्थ निघतो. खरी- खोटी बाब न्यायालयात समोर येईल. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना काही गोष्टी लपविल्या गेल्या असतील तर त्या तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.मशीद उभारणीसाठी हवा ट्रस्ट ; विजय वडेट्टीवार‘‘राम मंदीर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. परंतु,मशीद उभारणीसाठीसुध्दा ट्रस्ट स्थापन झाला पाहिजे. देश सर्व जाती धर्मांचा आहे. देशातील धार्मिक तेढ संपवून राजकारण केले पाहिजे. परंतु, मोदी सरकारकडून याबाबत अपेक्षा करता येत नाही.’’

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाPoliticsराजकारण