शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:24 IST

काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून मोदी सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहे

पुणे : ‘केंद्र सरकारने संरक्षण उत्पादनांच्या देशाअंतर्गत उत्पादनाला चालना दिली. त्यामुळे भारत आता शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश बनला आहे. ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता; पण संरक्षण खरेदीतील ‘दलाल’ बाहेर काढून सरकार थेट संबंधित देशांशीच करार करत आहेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या काळात विरोधी पक्ष केंद्र सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाहीत, एकाही मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, अमोल कविटकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात १९८४ नंतर पहिल्यांदाच देशाला दीर्घकाळ स्थिर सरकार मिळाले. मोदी सरकारच्या काळात सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या गेल्या. असे सांगून प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण अंगीकारत अंत्योदयासाठी काम केले. गरिबांना घर, पाणी, वीज, शौचालय, गॅस, आयुष्यमान कार्ड आदी सुविधा दिल्या. त्यामुळे ३० कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. काँग्रेसच्या १० वर्षांच्या काळात ८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते; पण मोदींनी तब्बल ३० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. जनधन बँक योजनेमुळे प्रत्येकाला खाते मिळालेच; पण बँकांचा नफाही सहा पटीने वाढला आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य यासह अनेक क्षेत्रांत देशाची मोठी प्रगती गेल्या ११ वर्षांत झाली आहे. काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट होत होते; पण आता या घटना बंद झाल्या आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण