शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका - माधव कौशिक

By श्रीकिशन काळे | Updated: May 26, 2024 15:59 IST

साहित्यिकांनी सर्जनशीलतेची देणगी या शक्तीचा प्रामाणिकपणे वापर करून लिहायला हवे

पुणे: ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनीमन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मसापचे विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह अंजली कुलकर्णी उपस्थित होते.

कौशिक म्हणाले, राजकीय सत्ता आणि साहित्यिक कधीच एकत्र चालू शकत नाहीत. कारण राजकीय सत्ता चुकली आणि त्यांनी सामान्य लोकांवर अन्याय केला, तर साहित्यिकच तो अन्याय लेखणीद्वारे मांडू शकतात. राजकीय नेत्यांनी साहित्यिकांचा कितीही सत्कार केला, तरी तुम्ही कधीच सत्य मांडायचे थांबवू नका, असा सल्ला कौशिक यांनी दिला.

‘लोकमत’च्या संपादकांचा गौरव

विशेष ग्रंथकार पारितोषिकांमध्ये दैनिक ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांचाही समावेश होता. त्यांना आशा संत पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारliteratureसाहित्यEducationशिक्षणPoliticsराजकारणMan ki Baatमन की बात