शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:22 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. 

पुणे : महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी अन्याय झालेला नाही. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार नाही म्हणून अन्याय करण्याची भुमिका अजिबात नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.  आरपीआय आठवले गटाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागण्या आम्हाला द्याव्यात, त्यांच्या मागण्या नक्की पुर्ण करू. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षामध्ये असल्याने विरोध करत आहेत. शेतकऱ्यांना ताकद देण्याची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.  

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात येण्याच्या मुद्दयावर ते म्हणाले की,  या घटनेमागे कोणाचा हात होता, हे पाहण्यासाठी ‘एनआयए’कडे तपास दिला आहे. एल्गार परिषदेमध्ये खरोखर कोणी नक्षलवादी होते का, हा तपास पोलिस करत आहेत. केंद्र सरकारने जो ‘एनआयए’कडून तपास सुरू केला आहे, त्यांना तो अधिकार आहे. पोलिसांनी सहा-सात जण नक्षलवादी आहेत, असे पुरावे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यामुळे ज्यांना तपास करायचा असेल त्यांनी तो करावा. पण परिषदेमध्ये भाषणे झाली म्हणून कोरेगाव भिमा येथे दंगल झाली, या पुणे पोलिसांच्या भुमिकेशी मी सहमत नाही. वढू गावात झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडला होता, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :budget 2020बजेटRamdas Athawaleरामदास आठवलेBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरे