शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:22 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. 

पुणे : महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी अन्याय झालेला नाही. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार नाही म्हणून अन्याय करण्याची भुमिका अजिबात नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.  आरपीआय आठवले गटाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागण्या आम्हाला द्याव्यात, त्यांच्या मागण्या नक्की पुर्ण करू. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षामध्ये असल्याने विरोध करत आहेत. शेतकऱ्यांना ताकद देण्याची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.  

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात येण्याच्या मुद्दयावर ते म्हणाले की,  या घटनेमागे कोणाचा हात होता, हे पाहण्यासाठी ‘एनआयए’कडे तपास दिला आहे. एल्गार परिषदेमध्ये खरोखर कोणी नक्षलवादी होते का, हा तपास पोलिस करत आहेत. केंद्र सरकारने जो ‘एनआयए’कडून तपास सुरू केला आहे, त्यांना तो अधिकार आहे. पोलिसांनी सहा-सात जण नक्षलवादी आहेत, असे पुरावे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यामुळे ज्यांना तपास करायचा असेल त्यांनी तो करावा. पण परिषदेमध्ये भाषणे झाली म्हणून कोरेगाव भिमा येथे दंगल झाली, या पुणे पोलिसांच्या भुमिकेशी मी सहमत नाही. वढू गावात झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडला होता, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :budget 2020बजेटRamdas Athawaleरामदास आठवलेBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरे