शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 20:22 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. 

पुणे : महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी अन्याय झालेला नाही. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार नाही म्हणून अन्याय करण्याची भुमिका अजिबात नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प  मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.  आरपीआय आठवले गटाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागण्या आम्हाला द्याव्यात, त्यांच्या मागण्या नक्की पुर्ण करू. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षामध्ये असल्याने विरोध करत आहेत. शेतकऱ्यांना ताकद देण्याची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.  

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात येण्याच्या मुद्दयावर ते म्हणाले की,  या घटनेमागे कोणाचा हात होता, हे पाहण्यासाठी ‘एनआयए’कडे तपास दिला आहे. एल्गार परिषदेमध्ये खरोखर कोणी नक्षलवादी होते का, हा तपास पोलिस करत आहेत. केंद्र सरकारने जो ‘एनआयए’कडून तपास सुरू केला आहे, त्यांना तो अधिकार आहे. पोलिसांनी सहा-सात जण नक्षलवादी आहेत, असे पुरावे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यामुळे ज्यांना तपास करायचा असेल त्यांनी तो करावा. पण परिषदेमध्ये भाषणे झाली म्हणून कोरेगाव भिमा येथे दंगल झाली, या पुणे पोलिसांच्या भुमिकेशी मी सहमत नाही. वढू गावात झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडला होता, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :budget 2020बजेटRamdas Athawaleरामदास आठवलेBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरे