शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पहिल्याच आदिवासी साहित्य पुरस्कारावर संक्रांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 17:17 IST

यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय या योजनेअंतर्गत आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता.

ठळक मुद्देशासन निर्णय स्थगित : आदिवासी लेखकांमध्ये नाराजी

पुणे : आदिवासी साहित्याचा प्रवाह समृद्ध व्हावा, नवनव्या लेखकांना प्रेरणा मिळावी, इतर साहित्य प्रवाहांहून आदिवासी साहित्य प्रवाह निराळा आहे याची जाणीव समग्र साहित्यविश्वाला व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय या योजनेअंतर्गत आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता. याबाबतचा अध्यादेशही राज्य शासनातर्फे २३ ऑगस्ट २०१७ रोजी काढण्यात आला. त्यानुसार यावर्षी हा पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने अचानक या पुरस्काराला स्थगिती दिल्याने आदिवासी साहित्यिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी यशंवतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार योजना साहित्य संस्कृती मंडळाकडून सुरु करण्यात आली. यामध्ये आजवर आदिवासी साहित्याचा समावेश करण्यात आला नव्हता. हा पुरस्कार ‘दलित साहित्य’ या प्रकारात दिला जायचा. याबाबत लळित रंगभूमीचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘आदिवासी साहित्य पुरस्कारा’चा समावेश स्वतंत्रपणे करण्यात यावा, अशी मागणी २०१३ पासून करण्यात येत होती. शासनाने यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय योजनेअंतर्गत डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने आदिवासी साहित्य पुरस्कार २०१८ पासून देण्यात येईल, या निर्णयाला २३ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाद्वारे मंजुरी दिली.२०१८ मध्ये आदिवासी साहित्य पुरस्कार कोणत्या साहित्यकृतीला देण्यात येणार आहे, याबाबतची माहिती डॉ. केदारी यांनी माहिती अधिकारात विचारली असता, अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार असल्याने हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. शासन निर्णयामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर नवीन अध्यादेश जारी करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे पहिल्याच आदिवासी साहित्य पुरस्कारावर संक्रात ओढावली आहे, अशी भावना केदारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.वर्षानुवर्षे आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार, शोषणाचे सावट आहे. दुसरीकडे, शासनाची आदिवासी समाजाबाबतची उदासिनताही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. सात दशके वाट पाहणा-या आदिवासी साहित्यिकांवर मराठी भाषा मंत्रालय आणि साहित्य संस्कृती मंडळ अन्याय करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.----------साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार नुकताच हाती आला आहे. त्यामुळे अध्यादेशाबाबत कल्पना नाही. स्थगित पुरस्काराबद्दल लवकरच माहिती घेतली जाईल.- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यGovernmentसरकार