शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पहिल्याच आदिवासी साहित्य पुरस्कारावर संक्रांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 17:17 IST

यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय या योजनेअंतर्गत आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता.

ठळक मुद्देशासन निर्णय स्थगित : आदिवासी लेखकांमध्ये नाराजी

पुणे : आदिवासी साहित्याचा प्रवाह समृद्ध व्हावा, नवनव्या लेखकांना प्रेरणा मिळावी, इतर साहित्य प्रवाहांहून आदिवासी साहित्य प्रवाह निराळा आहे याची जाणीव समग्र साहित्यविश्वाला व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय या योजनेअंतर्गत आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता. याबाबतचा अध्यादेशही राज्य शासनातर्फे २३ ऑगस्ट २०१७ रोजी काढण्यात आला. त्यानुसार यावर्षी हा पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने अचानक या पुरस्काराला स्थगिती दिल्याने आदिवासी साहित्यिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी यशंवतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार योजना साहित्य संस्कृती मंडळाकडून सुरु करण्यात आली. यामध्ये आजवर आदिवासी साहित्याचा समावेश करण्यात आला नव्हता. हा पुरस्कार ‘दलित साहित्य’ या प्रकारात दिला जायचा. याबाबत लळित रंगभूमीचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘आदिवासी साहित्य पुरस्कारा’चा समावेश स्वतंत्रपणे करण्यात यावा, अशी मागणी २०१३ पासून करण्यात येत होती. शासनाने यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय योजनेअंतर्गत डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने आदिवासी साहित्य पुरस्कार २०१८ पासून देण्यात येईल, या निर्णयाला २३ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाद्वारे मंजुरी दिली.२०१८ मध्ये आदिवासी साहित्य पुरस्कार कोणत्या साहित्यकृतीला देण्यात येणार आहे, याबाबतची माहिती डॉ. केदारी यांनी माहिती अधिकारात विचारली असता, अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार असल्याने हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. शासन निर्णयामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर नवीन अध्यादेश जारी करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे पहिल्याच आदिवासी साहित्य पुरस्कारावर संक्रात ओढावली आहे, अशी भावना केदारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.वर्षानुवर्षे आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार, शोषणाचे सावट आहे. दुसरीकडे, शासनाची आदिवासी समाजाबाबतची उदासिनताही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. सात दशके वाट पाहणा-या आदिवासी साहित्यिकांवर मराठी भाषा मंत्रालय आणि साहित्य संस्कृती मंडळ अन्याय करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.----------साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार नुकताच हाती आला आहे. त्यामुळे अध्यादेशाबाबत कल्पना नाही. स्थगित पुरस्काराबद्दल लवकरच माहिती घेतली जाईल.- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, साहित्य संस्कृती मंडळ

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यGovernmentसरकार