शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

क्रौर्य नाही, आध्यात्मिक शौर्य : संभाजीमहाराज मोरे; श्रीपाल सबनीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:16 IST

सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली : संभाजीमहाराज मोरेश्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, मोरे यांची टीका

पिंपरी : संतसाहित्याची विटंबना झाली, म्हणूनच लेखक आणि प्रकाशकांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. आनंद यादव यांना पायउतार करणारे आम्हीच वारकरी होतो. हे क्रौर्य नसून, संत साहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. त्यामुळे सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष, संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मोरे  म्हणाले, ‘‘संतसूर्य कादंबरीमुळे तुकोबारायांसारख्या संत साहित्यिकांची विटंबना झाली होती. त्याबाबत वारकऱ्यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर क्रौर्य आणि औदार्य यांचा विचार न करता सत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली. हा वैचारिक पराभव यादव यांना मान्य होता. ते स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले. हे वारकऱ्यांचे क्रौर्य नसून संतसाहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. परंतु, क्रौर्याच्या अतर्क्य उनाड गप्पा मारणाऱ्या सबनीसांनी संतसाहित्य वाचून चिंतन करावे.उगाच वारकऱ्यांच्या आध्यात्मिक शौर्याला आव्हान देऊ नये.  ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा।।’ असे रोख-ठोक बोलणाऱ्या तुकोबारायांचे आध्यात्मिक शौर्य अभंगातून तपासून पाहावे. कारण तुकोबाराय म्हणतात, ‘‘मायबापाहून बहू मायावंत। करू घातपात शत्रुहूनि।।’’  

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी ‘संतसूर्य’ कांदबरीतून संत तुकाराममहाराजांचे चारित्र्यहनन केल्याचे संत तुकाराममहाराजांच्या वंशजांनी उघडकीस आणल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे यादव यांना कादंबरी मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम झाला. त्या वेळी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. आनंद यादव : जीवन आणि साहित्यगौरव विषयावरील परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संतसाहित्यामध्ये क्रौर्य आहे का? असे विधान करीत वारकऱ्यांवर टीका केली. त्याला तुकोबारायांचे वंशज असणाऱ्या मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम