शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दशेला पाकिस्तानच जबाबदार, दहशतवादाला आश्रय दिला तर दुसरं काय होणार?, जयशंकर यांनी सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:36 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले.

पुणे-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय दिला गेला तर आणखी काय होणार? असंही ते पुढे म्हणाले. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

"ज्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद हा असेल तो देश कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि कधीच समृद्ध शक्ती म्हणून उदयास येऊ शकत नाही", असं एस. जयशंकर म्हणाले. 

दहशतवाद हाच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांचा मूलभूत मुद्दा आहे. ज्याला अजिबात नाकारता येऊ शकत नाही आणि आपण मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असंही ते म्हणाले. पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, प्रत्येक देशानं आपल्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढणं गरजेचं असतं. तसंच आपल्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांचीही अडचण सोडवायची असते. पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबतच्या मुद्द्यावर जयशंकर यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी देशातील स्थानिक भावनांचा विचार करणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

पाकिस्तानचा मूळ उद्योग दहशतवादजेव्हा एखादा देश गंभीर आर्थिक संकटात असतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक पर्याय शोधावे लागतात. यातूनच एखाद्या देशाला आपले आर्थिक मुद्दे सोडवावे लागतात. तसंच देशाला आपल्या राजकीय मुद्द्यांनाही सांभाळावं लागतं. जर एखाद्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद असेल तर कोणताही देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि समृद्ध होऊ शकत नाही, असं जयशंकर म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर