शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

दुर्दशेला पाकिस्तानच जबाबदार, दहशतवादाला आश्रय दिला तर दुसरं काय होणार?, जयशंकर यांनी सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:36 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले.

पुणे-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय दिला गेला तर आणखी काय होणार? असंही ते पुढे म्हणाले. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

"ज्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद हा असेल तो देश कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि कधीच समृद्ध शक्ती म्हणून उदयास येऊ शकत नाही", असं एस. जयशंकर म्हणाले. 

दहशतवाद हाच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांचा मूलभूत मुद्दा आहे. ज्याला अजिबात नाकारता येऊ शकत नाही आणि आपण मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असंही ते म्हणाले. पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, प्रत्येक देशानं आपल्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढणं गरजेचं असतं. तसंच आपल्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांचीही अडचण सोडवायची असते. पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबतच्या मुद्द्यावर जयशंकर यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी देशातील स्थानिक भावनांचा विचार करणं गरजेचं आहे असं म्हटलं. 

पाकिस्तानचा मूळ उद्योग दहशतवादजेव्हा एखादा देश गंभीर आर्थिक संकटात असतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक पर्याय शोधावे लागतात. यातूनच एखाद्या देशाला आपले आर्थिक मुद्दे सोडवावे लागतात. तसंच देशाला आपल्या राजकीय मुद्द्यांनाही सांभाळावं लागतं. जर एखाद्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद असेल तर कोणताही देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि समृद्ध होऊ शकत नाही, असं जयशंकर म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर