शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मिलिंदशी ३८ वर्षे कसलाही संपर्क नाही - आनंद तेलतुंबडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 05:24 IST

मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ असला तरी मागील ३८ वर्षे त्याच्याशी कसलाही संपर्क नाही. तो कुटुंबाचा एक सदस्य असला म्हणून थेट त्याच्या चळवळीशी संबंध जोडणे खेदजनक आहे.

पुणे - मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ असला तरी मागील ३८ वर्षे त्याच्याशी कसलाही संपर्क नाही. तो कुटुंबाचा एक सदस्य असला म्हणून थेट त्याच्या चळवळीशी संबंध जोडणे खेदजनक आहे. एल्गार परिषदेशीही काही संबंध नाही. देशात सध्या कायद्याचे राज्य नसून राज्यकर्त्यांना जे काम करायचे ते करत आहेत. बनावट पुरावे तयार करून मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फॅसिझम आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण आहे, हे त्यानांच माहित असेल, अशा शब्दांत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी संताप व्यक्त केला.विशेष न्यायालयाने अटक बेकायदा ठरवून सुटका केल्यानंतर तेलतुंबडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून ते म्हणाले, पोलिसांनी हा सर्व बनाव रचला आहे. मी १९८१-८२ मध्ये गुजरातमध्ये आयआयएममध्ये असताना मिलिंदचा नक्षली चळवळीशी संबंध आला. याला ३८ वर्षे झाली. त्यानंतर आमचा कधीही संपर्क आला नाही. त्याच्या चळवळीशी आमचा संबंध जोडणे चुकीचे आहे. एल्गार परिषदेसाठी आलेले माझे मित्र व नातेवाइकांना परिषदेआधी भेटलो. पण त्यानंतर गोव्याला गेलो. परिषदेत काय झाले, याची माहिती नव्हती. भीमा कोरेगावला घडलेला प्रकारही नंतर कळाला. अशा परिषदा घातक ठरू शकतात, यावर लेख लिहिला. त्यावर देशभरातून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. देशात सध्या कायद्याचे राज्य नाही. कायद्याचे राज्य असते तर या घटनांची भीती वाटली नसती. पण राज्यकर्ते जे करायचे ते करत आहेत. संपूर्ण यंत्रणा आपल्याविरोधात कारस्थान करत असल्याने भीती वाटत आहे. माझ्या विरोधात पोलीसांनी ईमेलचे पुरावे दिले असले तरी, ईमेल खोटे तयार केले जाऊ शकतात. पुरावेही बनावट तयार करून मला अडकविले जात आहे. त्यामुळे न्यायालयात त्याची प्रामाणिकता सिध्द होईल.

टॅग्स :Puneपुणे