शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार :  नितीन करमळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:21 IST

विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देअनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पीएच.डी, एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा ९ अधिसभा सदस्यांनी दिला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी सोमवारी सकाळी कुलगुरू कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी येत्या ४ दिवसात विद्यावेतनाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले आहे.   संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन गेल्या ३ महिन्यांपासून निधी नसल्याचे कारण देऊन कुलगुरूंनी बंद केले आहे. यापार्श्वभुमीवर अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ आदी ९ सदस्यांनी कुलगुरूंना सोमवारी निवेदन दिले. कुलगुरूंनी विद्यावेतनाचा प्रश्न येत्या १५ दिवसात न सोडविल्यास सिनेट सदस्यांकडून तीव्र आंदोलन व उपोषण केले जाईल असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.  विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रूपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र ते अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र ते बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत आले आहेत.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंन्ट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंन्ट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यावेतन सुरू करावे या मागणीसाठी भिक माँगो आंदोलन करून गोळा केलेले पैसे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याकडे दिले होते. मात्र डॉ. उमराणी यांनी ते पैसे स्वीकारले नाहीत. विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ....................सार्वजनिक कार्यक्रमांमधील आश्वासनांचे काय झाले?कुलगुरू डॉ. नितीन करमळकर जाहीर कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी हिताचे कार्यक्रम घेतले जातील असे आश्वासन वारंवार देत असतात. मात्र प्रत्यक्षात संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करून विद्यार्थी हिताच्या विरोधात कसा निर्णय घेतला जात आहे अशी विचारणा अधिसभा  सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरStudentविद्यार्थी