शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तेव्हा मी म्हणालो होतो, "विहिरीत उडी मारून जीव देईन पण..."; लोकशाहीवर बोलताना गडकरींनी दिलं मनं जिंकणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 01:09 IST

"जर देशात काँग्रेस कमी होत आहे, तर त्याची जागा स्थानिक पक्ष घेत आहेत आणि हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळेच लोकशाहीत विरोधीपक्ष मजबूत असायला हवा..."

पुणे - लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष आणि शक्तीशाली विरोधपक्ष ही लोकशाहीची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेस पक्ष मजबुत व्हावा, असे मला मनापासून वाटते, गडकरी म्हणाले, जर देशात काँग्रेस कमी होत आहे, तर त्याची जागा स्थानिक पक्ष घेत आहेत आणि हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळेच लोकशाहीत विरोधीपक्ष मजबूत असायला हवा, असे मला मनापासून वाटते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुण्यात 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लोकशाही संदर्भात आपल्याला काय वाटते?  मी असे मानतो की आपला लोकशाहीवर अत्यंत विश्वस आहे. विरोधीपक्ष असायला हवा आणि विरोधीपक्ष असेल तरच लोकशाही जिवंत राहील, असं आपण मानता, तर या दृष्टीने आपण काय करत आहात? असा प्रश्न लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गडकरी यांना विचारला असता ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, लोकसभेत पंडित जवाहरलाल नेहरू या गोष्टीचे एक उदाहरण आहेत की, अटलजी निवडणूक हरल्यानंतरही पंडितजींनी त्यांचा सन्मान केला होता. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, की जे काँग्रेसचे आहेत. त्यांनी काँग्रेसवर श्रद्धा ठेऊन काँग्रेसमध्येच रहायला हवे. 

जेव्हा मी भाजपचे काम करायला सुरुवात केली तेव्हा मी पुण्यात आलो होतो. हा माझ्या जीवनातला एक फार चांगला प्रसंग आहे. तेव्हा लक्ष्मणराव मानकर आणि  मी महाराष्ट्र एक्सप्रेसने सकाळी पुणे स्टेशनवर उतरलो. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गाडी आली. मी भाजपचं साहित्य खांद्यावर घेऊन चालायला लागलो. तेव्हा तसेच काम करत होते. तेवढ्यात डॉक्टर श्रीकांत जिचकर माझ्या मागून आले. ते फस्टक्लासच्या डब्यातून येत होते. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, हे सामाना याला देऊन टाक, तू का घेतोय, तेव्हा मी म्हणालो हे माझ्या पक्षाचं आहे. कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलोय, यावर ते म्हणाले, नितीन तू फार चांगला आहेस, पण तुला या पक्षाचे काही भविष्य नाही. तू पक्ष सोड, काँग्रेस पक्षात जा, चांगल्या पक्षात जा, तुझं करीअर चांगलं होईल. मी म्हणालो, श्रीकांत, मी विहिरीत उडी मारून जीव देईन पण, माझे विचार आणि पक्ष सोडणार नाही. 

१९७८-८० ची गोष्ट आहे, पुणे स्टेशनच्या बाहेर काळ्या भिंतीवर लिहिलेले होते, फर्रे फर्रे ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन आणि बाजूला लिहिले होते, हम दो हमारे दो... ते बघून मी हसतही होतो आणि मला दुःखही होत हतं की, मी ज्या पक्षाच्या पहिल्याच बोठकीला जात आहे, त्याचे भविष्य काय असेल. तर क्षणभर मला वाटले की पक्षाचे भविष्य काय असेल, पण अनेक कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली आणि दोन असलेल्या पक्षाचे नेते अटलजी पंतप्रधान बनले. यामुळे संधी मिळेल. निराश होऊन पक्ष सोडने योग्य नाही. जी विचारधारा आहे ती कायम ठेवून काम करायला हवे. आपण परिश्रम करत राहिलात तर एक वेळ पराभवही होतो आणि एकवेळ विजयही होतो हे निश्चित. असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. 

यावेळी, नितीन गडकरी यांच्या हस्ते 'लोकमत' आयोजित 'पत्रकार पुरस्कार २०२२' कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVijay Dardaविजय दर्डाLokmat Journalist Awardsलोकमत पत्रकारिता पुरस्कारcongressकाँग्रेसBJPभाजपा