शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 20:55 IST

महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत.

ठळक मुद्देउदासिन प्रशासनामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ फलकांवरच प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काही वर्षांपासून जनजागृती मोहीमसर्व पुलांवर निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक

पुणे : पुण्याचे सौदर्य असलेल्या मुळा-मुठेचे प्रदुषण टाळण्यासाठी व आपले शहर ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता शहरातील सर्व पुलांजवळ ठेवलेल्या निर्माल कलशात टाकण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने ठिक-ठिकाणी फलक लावून केले आहे. परंतु शहरातील पुलांवरील हे निर्माल्य कलश गायब झाल्याने नुकत्याच साजऱ्या झालेल्या दसऱ्यामुळे घराघरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले निर्माल्य नागरिकांनी नदी न टाकता पुलांवरच टाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे निर्माल्यपुलांवर पडून असून, महापालिकेच्या उदासिन प्रशासनामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ केवळ फलकांवर राहिले आहे.शहरामध्ये नुकताच नऊ दिवसांचा नवरात्री उत्सव साजरा झाला. नवरात्रीनिमित्त शहरातील घराघरांमध्ये देवीचा घट बसविला जातो. या घटाला दररोज फुलांच्या माळा घातल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या या घटाला दाखवून नैवद्य उठविला जातो. या घटामुळे व दस-या निमित्त देवाला, दाराला, गाड्यांना फुलांचे हार घातले जातात. यामुळे गणपती प्रमाणेच नवरात्रीत देखील घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. निर्माल्य देवाचे असल्याने ते कच-यात न टाकता नदी टाकण्याची लोकांची धार्मिक भावना असते. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीत टाकल्यास नदीचे प्रदूषण होऊ शकते. हे टाळण्यासाठी महापालिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती मोहीम राबवली. शाळा, महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये कार्यक्रम घेऊन पुणेकरांनी निर्माल्य नदीत न टाकता शहराच्या विविध भागात, पुलांवर ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकावे, असे आवाहन करण्यात आले. यामुळे पुणेकर नागरिक देखील सजग झाले असून, प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य कलश शोधत असतात. परंतु सध्या शहरातील सर्व पुलांवरील निर्माल्य कलश गायब झाले आहेत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य नदीत टाकून नदीचे प्रदुषण होऊ नये म्हणून निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक सर्व पुलांवर लावण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत. यामुळे शुक्रवारी (दि.१९) रोजी शहरातील सर्व पुलांवर निर्माल्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता पुलावर कलश असल्याचे फलक लावलेल्या ठिकाणी पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे निर्माल्य पुलांवरच टाकले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांकडून या निर्माल्याच्या पिशव्या पुलांवर अस्ताव्यस्त झाल्या आहेत.हे चित्र शहरातील सर्व पुलांवर व कॅनॉलच्या लगत दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीmula muthaमुळा मुठा